शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

धडपडणाऱ्या शेतकरीपुत्राची करूण ‘एक्झिट’

By admin | Updated: August 23, 2015 02:39 IST

उमरेड येथील आशीष अरूण कचवे (२०) या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी सकाळी केलेल्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

राळेगावात हळहळ : तरुणाच्या जाण्याने अशिक्षित आई-वडील निराधारराळेगाव : उमरेड येथील आशीष अरूण कचवे (२०) या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी सकाळी केलेल्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जीवनात काहीतरी चांगले करू पाहणाऱ्या या तरुणाने अचानक जगातून ‘एक्झिट’ घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दहावी पास झाल्यानंतर त्याची पुढील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. घरात आजीच्या नावे ५.१७ हेक्टर शेत जमीन आहे. ही शेती त्याचे वडील वहीत करीत होते. वडील, आई, आजी अडाणी असल्याने त्या तुलनेत घरातील हा तरुण मुलगा थोडाफार शिक्षित होता. त्याच्या खांद्यावर अवेळीच शेतीचाही भार काही वर्षांपासून आला होता. शेतीचा गाडा तो कसा तरी गेल्या काही दिवसांपासून ओढत होता. आजीच्या नावावरील शेतीवर एक लाख ४६ हजार इतके कर्ज होते. रिधोरा सोसायटीचे हे कर्ज थकित होते. या शिवाय काही खासगी कर्जही त्याच्याकडे थकित होते. फवारणीच्या औषधांची व मजुरांच्या मजुरीची कशी जुळवणी करावी या विवंचनेत तो घटनेच्या दिवशी शेतात बसून होता, अशी माहिती मिळाली आहे. यातच त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. घरी आई, वडील, आजी, लहान भाऊ असे सदस्य आहेत. म्हातारपणाची त्यांची काठी हिरावल्या गेली आहे. यावर्षी शेतात तूर व कापसाचे पीक उभे आहे. उत्पन्न बऱ्यापैकी होईल असा सर्वांचा अंदाज होता. त्यातच शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनाही सुरू केल्या. असे असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे, तरीही इतका टोकाचा निर्णय आशीषने का घेतला, असा प्रश्न सर्वत्र चर्चील्या जात आहे. नागपंचमीच्या सणाला मजुरांचा चुकारा देणे अशक्य होते. या विवंचनेतूनही आशीषने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. एसडीओ जनार्दन विधाते व सहकाऱ्यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली व सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)