शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उपग्रहाच्या मदतीने पीक पैसेवारी

By admin | Updated: November 4, 2015 02:46 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सॅटेलाईटच्या मदतीने पिकांची पाहणी करून पैसेवारी जाहीर होणार आहे. तसेच पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखा बदलविण्यात आल्या आहेत. पैसेवारी काढण्यासाठी ब्रिटिशकालीन तक्त्यांचा वापर होत होता. यामुळे दुष्काळी स्थिती असली तरी दुष्काळ जाहीर होत नव्हता. १८८४, १९२७ आणि १९४४ यावर्षी पुर्वीच्या मुंबई राज्यातील सर्व प्रमुख पिकांच्या समाधानकारक उत्पन्नाचे तक्ते कृषी विभागाने बनविले होते. या तक्त्यांची पिकांच्या उत्पन्नाशी तुलना करून आणेवारी काढली जात होती. १९६२ साली व्ही. एन. जोशी समिती, १९७१ मध्ये व्ही. एम. दांडेकर समिती, १९८४ मध्ये भगवंत गायकवाड समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात आली. यानंतरही तक्रारी कायम होत्या. यामुळे राज्य शासनाने यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. नवी पीक पैसेवारीची पद्धती घोषित करण्यात आली. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने पिकांचे फोटो घेतले जाणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे.पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समान तारखा ठरविण्यात आल्या आहेत. पूर्वी अमरावती विभागात १५ जानेवारी रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत होती. आता ३१ डिसेंबरलाच अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी, ३१ आॅक्टोबरला सुधारित पैसेवारी आणि ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. अशी काढणार पैसेवारी४पैसेवारी जाहीर करण्यासाठी १०० गुणिला पाहणी केलेले हेक्टरी उत्पादन भागीला प्रमाण उत्पादन असे सूत्र राहणार आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष आहे. यामध्ये जून ते जुलै महिन्यात एकूण सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान , संपूर्ण मान्सून कालवधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान, संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ पर्जन्यमानात खंड राहील्यास पिकावर त्याचा विपरित परिणाम झाल्यास दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात येणार आहे.