शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

उपग्रहाच्या मदतीने पीक पैसेवारी

By admin | Updated: November 4, 2015 02:46 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सॅटेलाईटच्या मदतीने पिकांची पाहणी करून पैसेवारी जाहीर होणार आहे. तसेच पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखा बदलविण्यात आल्या आहेत. पैसेवारी काढण्यासाठी ब्रिटिशकालीन तक्त्यांचा वापर होत होता. यामुळे दुष्काळी स्थिती असली तरी दुष्काळ जाहीर होत नव्हता. १८८४, १९२७ आणि १९४४ यावर्षी पुर्वीच्या मुंबई राज्यातील सर्व प्रमुख पिकांच्या समाधानकारक उत्पन्नाचे तक्ते कृषी विभागाने बनविले होते. या तक्त्यांची पिकांच्या उत्पन्नाशी तुलना करून आणेवारी काढली जात होती. १९६२ साली व्ही. एन. जोशी समिती, १९७१ मध्ये व्ही. एम. दांडेकर समिती, १९८४ मध्ये भगवंत गायकवाड समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात आली. यानंतरही तक्रारी कायम होत्या. यामुळे राज्य शासनाने यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. नवी पीक पैसेवारीची पद्धती घोषित करण्यात आली. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने पिकांचे फोटो घेतले जाणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे.पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समान तारखा ठरविण्यात आल्या आहेत. पूर्वी अमरावती विभागात १५ जानेवारी रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत होती. आता ३१ डिसेंबरलाच अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी, ३१ आॅक्टोबरला सुधारित पैसेवारी आणि ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. अशी काढणार पैसेवारी४पैसेवारी जाहीर करण्यासाठी १०० गुणिला पाहणी केलेले हेक्टरी उत्पादन भागीला प्रमाण उत्पादन असे सूत्र राहणार आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष आहे. यामध्ये जून ते जुलै महिन्यात एकूण सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान , संपूर्ण मान्सून कालवधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान, संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ पर्जन्यमानात खंड राहील्यास पिकावर त्याचा विपरित परिणाम झाल्यास दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात येणार आहे.