शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

पुनर्वसनात सुविधांचे आदेश पायदळी

By admin | Updated: May 10, 2014 00:35 IST

कळंब बेंबळा प्रकल्पासाठी संपादित थाळेगाव (ता.बाभूळगाव)चे सात वर्षांपूर्वी येथे पुनर्वसन झाले़

 गजानन अक्कलवार - कळंब

बेंबळा प्रकल्पासाठी संपादित थाळेगाव (ता.बाभूळगाव)चे सात वर्षांपूर्वी येथे पुनर्वसन झाले़ या गावात आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहे़ या आदेशाकडे दुर्लक्ष करीत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी थाळेगाववासीयांना वार्‍यावर सोडले आहे. या गावातील नागरिकांना आजही दाखला मिळविण्यासाठी बाभूळगावला जावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते कळंबच्या लोकप्रतिनिधीसाठी मतदान करतात. पंचायत समितीच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास बाभूळगावला जावे लागते. त्यामुळे त्यांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. गाव कळंब तहसीलमध्ये असले तरी, पंचायत समिती मात्र बाभूळगाव आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करीत या गावातील नागरिक आपले जीवन रेटत आहे. पुनर्वसित गावातील सर्व कुटुंब अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आहे़ घर बांधण्यासाठी कुठलीही रक्कम दिली नसल्याने काहींनी कुडाचे घर उभारून राहुटी ठोकली़ प्रकल्पात वडिलोपार्जित मोठी घरे सोडून आता त्यांना कुडाच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मनाची होणारी घालमेल न पाहावणारी आहे. असे असताना प्रशासनाने गेंड्याची कातडी पांघरल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. याठिकाणी पाण्याची पुरेसी व्यवस्था नाही. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नाल्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे़ काही ठिकाणच्या नाल्या बुजल्या, तर काही ठिकाणी नाल्यात झाडा-झुडपांनी जागा घेतली़ लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची या गावातील नागरिकांची ओरड आहे़ पुनर्वसनाच्यावेळी शासनाच्या प्रतिनिधींनी मोबदला म्हणून मिळणारी रक्कम डोळे दीपवणारी सांगितली होती. पुनर्वसितांना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही़ सर्व आवश्यक सुविधा तातडीने पुरविल्या जातील़ भरीव आणि वाढीव मोबादलासुध्दा तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ परंतु अजुनही शासनाकडून पाहिजे तो मोबदला मिळालेला नाही. खोटे आश्वासने देऊन शासनाने आमची फसवणूक केल्याची तीव्र प्रतिक्रिया या गावातील नागरिकांची आहे. शासनाने सरसकट ५० हजार रुपये एकराने जमिनी खरेदी केल्या़ कोणालाही भूमिहीन करायचे नाही, हे शासनाचे धोरण आहे. परंतु बेंबळा प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन होऊन दुसर्‍याच्या शेतात राबावे लागत आहे. वाढीव मोबदला मिळावा म्हणून काही शेतकर्‍यांनी न्यायालयातही धाव घेतली़ परंतु तेथेही न्यायासाठी झगडण्याची वेळ आली आहे़