शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

४० हजार क्विंटल तूर उघड्यावर

By admin | Updated: April 11, 2017 00:13 IST

बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नाफेडच्या केंद्रांना पसंती दिली आहे.

नाफेड केंद्र : दिग्रस तालुक्यातील तीन हजार शेतकरी हवालदिलदिग्रस : बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नाफेडच्या केंद्रांना पसंती दिली आहे. येथील बाजार समितीच्या आवारात नाफेडने खरेदी केंद्र उघडले. परंतु गत काही दिवसांपासून खरेदी होत नसल्याने सुमारे ४० हजार क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची तूर बेवारस पडून आहे. केवळ बारदाणा नसल्याचे कारण पुढे केल्याने तीन हजार शेतकरी हवालदिल झाले आहे.संपूर्ण जिल्ह्यात तूर खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे. तुरीचे व्यापाऱ्यांचे भाव हमीदरापेक्षाही कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राला पसंती दिली आहे. नाफेड तुरीला पाच हजार ५० रुपये भाव देत आहे. त्यामुळे दिग्रसच्या खरेदी केंद्रावर एकच गर्दी उसळली. या गर्दीवर मात करण्यासाठी बाजार समितीने टोकण पद्धत अवलंबली. तीन हजार शेतकऱ्यांच्या नावांची नोंद करण्यात आली. परंतु दिवसाकाठी केवळ दहा ते १२ टोकण दिले जात असल्याने तीन हजार शेतकऱ्यांचा नंबर केव्हा लागेल, अशी चिंता आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी आपली तूर बाजार समितीच्या आवारात आणली आहे. लिलाव होत नसल्याने तूर बेवारस पडून आहे. बारदाणे नसल्याचे क्षुल्लक कारण करून खरेदीस विलंब लावला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीला बाजार समितीच्या लिलावात चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत अर्धाही भाव मिळत नाही. त्यातच नाफेडने खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. गर्दी पाहून मॉश्चरचे कारण पुढे केले. खरेदी बंद केली. त्यानंतर टोकण पद्धत सुरू करण्यात आली. तीन हजार शेतकऱ्यांनी नावे नोंदविली. आता बारदाणा नाही आणि गोदामात ठेवायला जागा नाही, असे कारण सांगत १४ फेब्रुवारीला ज्यांनी नावे नोंदविली त्यांचीच खरेदी केली जात होती. नाफेडने अशाच पद्धतीने खरेदी सुरू ठेवल्यास तूर केव्हा विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात ४० हजार क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.उघड्यावर तूर असल्याने राखणदार ठेवावा लागत आहे. तसेच ताडपत्री भाड्याने आणून झाकावी लागत आहे. समितीत कोणत्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाजार समितीला वारंवार शेतकरी याबाबत सांगत आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नाही. एकंदरीत दिग्रस येथील नाफेडचे केंद्र मुस्कटदाबी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांची नाईलाजाने व्यापाऱ्यांकडे धावबाजार समितीतील नाफेड केंद्रावर विक्रीस लांब रांग असते. त्यामुळे अनेक शेतकरी बाजारात व्यापाऱ्यांना तूर विकण्याच्या मनस्थितीत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनही यात कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांच्या घशात जावी, असा शासनाचा उद्देश तर नसावा ना; अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. दिग्रससारखीच अवस्था पुसद, महागाव आणि उमरखेड येथील आहे. शेतकरी तूर विकण्यासाठी बाजार समितीत घेवून येतात. परंतु या ठिकाणी टोकणच्या नावाखाली त्यांना परत पाठविले जाते. एकदा गावावरून घेवून आलेली तूर परत नेणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी बाजार समितीतच तूर ठेवतात. उमरखेडमध्ये खरेदी बंदउमरखेड : तालुक्यात नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. दरम्यान, सोमवारी खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी शिवसेनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तालुक्यात यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. नाफेडचे खरेदी केंद्र गत १२ दिवसांपासून बंद आहे. स्थानिक खरेदी-विक्री संघाच्या एजंसीमार्फत नाफेडची खरेदी सुरू होती. परंतु ती बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. तत्काळ खरेदी सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवीण पाटील, चितांगराव कदम, कृष्णा पाटील देवसरकर आदींनी केली आहे.