शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत यादीतून डावलले

By admin | Updated: May 12, 2014 00:19 IST

सरुळ अकाली पाऊस आणि गारपिटीने नुकसान होऊनही मदतीतून डावलण्यात आले. याउलट रबीचा पेरा नसलेल्या लोकांना मदत देण्यात आली.

दिलीप भाकरे - सरुळ अकाली पाऊस आणि गारपिटीने नुकसान होऊनही मदतीतून डावलण्यात आले. याउलट रबीचा पेरा नसलेल्या लोकांना मदत देण्यात आली. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील सारफळी शिवारात घडला. तलाठी, कृषी सहायक आणि सहकारी कर्मचार्‍यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करताना गैरप्रकार केला. नुकसानीचे फेरसर्वेक्षण करून खर्‍या नुकसानग्रस्तांना लाभ द्यावा, अशी मागणी सारफळी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍यांनी शेताची प्रत्यक्ष पाहणी केली नाही. गावातील काही लोकांनी सांगितलेल्या शेतकर्‍यांची नावे नुकसानीच्या यादीत नोंदविण्यात आली. यात खरे लाभार्थी वगळले गेले. ज्यांच्या शेतात रबीचा पेराच नाही, अशा शेतकर्‍यांची नावे गारपीट आणि अकाली पावसाने नुकसान झालेल्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. गहू, हरभरा, तीळ, भाजीपाला आदी पिके असलेल्या शेतकर्‍यांचे सर्वेक्षणात कुठेही नाव नाही. या शेतकर्‍यांचा नैसर्गिक प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला आहे. त्यांना शासनाने घोषित केलेल्या मदतीचा लाभ मिळणार होता. भ्रष्ट कर्मचार्‍यांमुळे या मदतीपासूनही वंचित राहावे, लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना डावलून अपात्र लोकांना मदतीचा लाभ देणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी आणि खर्‍या लाभार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर ५० च्यावर मदतीपासून वंचित शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी बाभूळगाव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, मुख्यमंत्री आदींना पाठविण्यात आल्या आहे. सदर निवेदनावर कार्यवाही न झाल्यास बाभूळगाव तहसीलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.