शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नगराध्यक्ष आरक्षण सोडत ९ ला

By admin | Updated: November 6, 2015 03:40 IST

नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार ९ नोव्हेंबर रोजी काढले

यवतमाळ : नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार ९ नोव्हेंबर रोजी काढले जाणार आहे. या आरक्षणानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. १ नोव्हेंबरला जिल्ह्यातील झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या सहा नगरपंचायतींसाठी मतदान झाले. २ नोव्हेंबरला त्याची मतमोजणी झाली. राळेगाव व महागावात अनुक्रमे भाजपा व परिवर्तन विकास आघाडीला बहुमत मिळाले. अन्य चार नगरपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. तेथे सेना-भाजपासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. अनेक ठिकाणी सेना-राष्ट्रवादी, भाजपा-काँग्रेस अथवा सेना-काँग्रेस आणि भाजपा-राष्ट्रवादी असे समीकरण राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सहा नगरपंचायतींमध्ये तब्बल २३ अपक्ष उमेदवार निवडून आले असून त्यांची भूमिका चार नगरपंचायतीत निर्णायक राहू शकते. नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असले तरी अध्यक्ष कोणत्या संवर्गातील होणार हे अद्याप स्पष्ट नाही. गेली चार-पाच दिवस याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्षपदाचे आरक्षण केव्हा निघणार हे निवडणूक विभागालाही माहीत नव्हते. अखेर गुरुवारी या संबंधीचे आदेश निवडणूक विभागात धडकले. ९ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत अध्यक्षपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. त्यानंतरच सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे त्या संवर्गातील उमेदवार आहे काय, हे स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी बहुमत आहे, पण त्या संवर्गातील उमेदवार नाही, अशी स्थितीही एखाद वेळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगावात भाजपाची सत्ता स्थापन होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची माळ या विजयाचे शिल्पकार आमदार प्रा.डॉ. अशोक उईके कुणाच्या गळ्यात घालतात हे ठरणार आहे. महागावातही परिवर्तन विकास आघाडीला बहुमत असल्याने नगराध्यक्ष त्यांचाच होणार हे उघड आहे. मात्र आरक्षण काय सांगते यावर सर्व काही अवलंबून आहे. कळंब आणि मारेगावात मोठा पक्ष म्हणून सेना सत्तेचा दावा करू शकते. मात्र तेथे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी चार जागांची गरज भासणार आहे. झरीमध्येसुद्धा भाजपाचीच सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. बाभूळगावात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने त्याच पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान होईल, असे दिसते. मात्र निवडणुकीपूर्वीपासून सोबत असलेली भाजपा-सेना अपक्षांच्या मदतीने सत्तेत बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कळंब, मारेगाव, झरी व बाभूळगाव या तालुक्यात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होईल, हे सांगणे जरा जिकरीचेच आहे. कारण तेथे युती व आघाडीच्या नेत्यांनी जोडतोड करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालविले आहे. सध्याचे चित्र पाहता सहा पैकी भाजपा-सेनेला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एक नगरपरिषद सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे ताब्यात मिळण्याची स्थिती आहे. एका नगर परिषदेत अपक्षांची सत्ता राहील. मात्र यात जोडतोड करून फेरबदल करण्याची तयारीही सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)फुगा फुटला, पक्ष नेत्यांबाबत काय भूमिका घेणार ?४नगरपंचायत निवडणुकीत महागावात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा फुगा फुटला आहे. शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक शिवसेना लढली. मात्र देवसरकरांना महागावकरांनी प्रतिसादच दिला नाही. या पराभवाचे खापर त्यांनी आता जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्यांवर फोडण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ‘अवाजवी हस्तक्षेप’ असे हत्यार पुढे केले आहे. अशीच स्थिती महागावात भाजपाची झाली आहे. केवळ एक जागा भाजपाला मिळाली. राजकीय पक्षांऐवजी गोरगरीब उमेदवारांचा समावेश असलेल्या परिवर्तन विकास आघाडीला मतदारांनी आपली पसंती दर्शविली. ज्यांच्या नेतृत्वात भाजपा-सेना निवडणूक लढली त्यांच्याबाबत पक्ष स्तरावरून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. सेनेकडे खासदार, मंत्रीपद आहे. त्यानंतरही सेनेला कोणत्याच नगरपरिषदेत बहुमत मिळाले नाही. या उलट आमदार अशोक उईके यांनी राळेगावात एकहाती सत्ता मिळविली. भाजपाच्या तुलनेत सेनेला सर्वकाही असूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे राजकीय गोटात बोलले जाते.