शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

नगराध्यक्ष आरक्षण सोडत ९ ला

By admin | Updated: November 6, 2015 03:40 IST

नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार ९ नोव्हेंबर रोजी काढले

यवतमाळ : नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार ९ नोव्हेंबर रोजी काढले जाणार आहे. या आरक्षणानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. १ नोव्हेंबरला जिल्ह्यातील झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या सहा नगरपंचायतींसाठी मतदान झाले. २ नोव्हेंबरला त्याची मतमोजणी झाली. राळेगाव व महागावात अनुक्रमे भाजपा व परिवर्तन विकास आघाडीला बहुमत मिळाले. अन्य चार नगरपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. तेथे सेना-भाजपासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. अनेक ठिकाणी सेना-राष्ट्रवादी, भाजपा-काँग्रेस अथवा सेना-काँग्रेस आणि भाजपा-राष्ट्रवादी असे समीकरण राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सहा नगरपंचायतींमध्ये तब्बल २३ अपक्ष उमेदवार निवडून आले असून त्यांची भूमिका चार नगरपंचायतीत निर्णायक राहू शकते. नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असले तरी अध्यक्ष कोणत्या संवर्गातील होणार हे अद्याप स्पष्ट नाही. गेली चार-पाच दिवस याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्षपदाचे आरक्षण केव्हा निघणार हे निवडणूक विभागालाही माहीत नव्हते. अखेर गुरुवारी या संबंधीचे आदेश निवडणूक विभागात धडकले. ९ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत अध्यक्षपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. त्यानंतरच सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे त्या संवर्गातील उमेदवार आहे काय, हे स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी बहुमत आहे, पण त्या संवर्गातील उमेदवार नाही, अशी स्थितीही एखाद वेळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगावात भाजपाची सत्ता स्थापन होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची माळ या विजयाचे शिल्पकार आमदार प्रा.डॉ. अशोक उईके कुणाच्या गळ्यात घालतात हे ठरणार आहे. महागावातही परिवर्तन विकास आघाडीला बहुमत असल्याने नगराध्यक्ष त्यांचाच होणार हे उघड आहे. मात्र आरक्षण काय सांगते यावर सर्व काही अवलंबून आहे. कळंब आणि मारेगावात मोठा पक्ष म्हणून सेना सत्तेचा दावा करू शकते. मात्र तेथे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी चार जागांची गरज भासणार आहे. झरीमध्येसुद्धा भाजपाचीच सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. बाभूळगावात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने त्याच पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान होईल, असे दिसते. मात्र निवडणुकीपूर्वीपासून सोबत असलेली भाजपा-सेना अपक्षांच्या मदतीने सत्तेत बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कळंब, मारेगाव, झरी व बाभूळगाव या तालुक्यात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होईल, हे सांगणे जरा जिकरीचेच आहे. कारण तेथे युती व आघाडीच्या नेत्यांनी जोडतोड करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालविले आहे. सध्याचे चित्र पाहता सहा पैकी भाजपा-सेनेला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एक नगरपरिषद सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे ताब्यात मिळण्याची स्थिती आहे. एका नगर परिषदेत अपक्षांची सत्ता राहील. मात्र यात जोडतोड करून फेरबदल करण्याची तयारीही सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)फुगा फुटला, पक्ष नेत्यांबाबत काय भूमिका घेणार ?४नगरपंचायत निवडणुकीत महागावात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा फुगा फुटला आहे. शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक शिवसेना लढली. मात्र देवसरकरांना महागावकरांनी प्रतिसादच दिला नाही. या पराभवाचे खापर त्यांनी आता जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्यांवर फोडण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ‘अवाजवी हस्तक्षेप’ असे हत्यार पुढे केले आहे. अशीच स्थिती महागावात भाजपाची झाली आहे. केवळ एक जागा भाजपाला मिळाली. राजकीय पक्षांऐवजी गोरगरीब उमेदवारांचा समावेश असलेल्या परिवर्तन विकास आघाडीला मतदारांनी आपली पसंती दर्शविली. ज्यांच्या नेतृत्वात भाजपा-सेना निवडणूक लढली त्यांच्याबाबत पक्ष स्तरावरून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. सेनेकडे खासदार, मंत्रीपद आहे. त्यानंतरही सेनेला कोणत्याच नगरपरिषदेत बहुमत मिळाले नाही. या उलट आमदार अशोक उईके यांनी राळेगावात एकहाती सत्ता मिळविली. भाजपाच्या तुलनेत सेनेला सर्वकाही असूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे राजकीय गोटात बोलले जाते.