शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘डीआरडीए’च्या अनेक योजना केवळ कागदावर

By admin | Updated: February 3, 2015 23:03 IST

ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आल्या आहे. या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातील कर्मचाऱ्यांचा

यवतमाळ : ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आल्या आहे. या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातील कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधसुद्धा शासनाने मंजूर केला आहे. परंतु गेल्या काही वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना बंद पडल्या आहे. त्यामुळे या योजनांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे पुनर्गठन करण्यात येत असून त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. परंतु त्यापैकी अनेक योजना बंद पडल्याचे दिसून येते. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, हरियाली योजना आदींसह शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेले आहेत. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि इंदिरा आवास योजनेच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आता बदल झाले आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सध्या असलेले मनुष्यबळ कालबाह्य झाल्याच्या निर्णयावर शासनाचे ग्रामीण विकास खाते पोहोचले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये काही पदे अनावश्यक असून योजनांच्या सुधारित अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवीन पदे निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचा आढावा घेवून सुधारित आकृतिबंध तयार करण्याची आवश्यकता आहे. या प्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे पुनर्गठन करण्यासाठी शासनास शिफारसी करण्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील आढावा घेवून पुनर्गठन करण्यासाठी अभ्यास करून समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अतिरिक्त संचालक लीना बनसोड आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा साताऱ्याचे प्रकल्प संचालक गिरीश भालेराव यांची या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने इतर राज्यातील या संदर्भातील वस्तुस्थिती विचारात घेण्यासाठी एक-दोन राज्यात अभ्यास दौरा करणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत शासनाला आपला अहवाल शिफारशींसह सादर करण्याचे आदेश शासनाने काढले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामांना गती यावी व या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाकडून हे पावले उचलल्या जात आहे. (प्रतिनिधी)