शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा

By admin | Updated: April 29, 2016 02:32 IST

स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा, स्वत:ची क्षमता सिद्ध करा, व्यक्तीने स्वत:ला परिपूर्ण केल्यास अशा व्यक्तींना कुणाकडेही कशासाठी हात पसरवावे लागत नाही ...

सोमाभाई मोदी : राज्यस्तरीय तेली समाज आत्मचिंतन शिबिरयवतमाळ : स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा, स्वत:ची क्षमता सिद्ध करा, व्यक्तीने स्वत:ला परिपूर्ण केल्यास अशा व्यक्तींना कुणाकडेही कशासाठी हात पसरवावे लागत नाही तर त्यांच्याकडे स्वत:हून संधी चालत येतात, तेंव्हा प्रत्येक क्षणाचा उपयोग घेत क्रियाशिल व्हा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू व तेली समाजाचे राष्ट्रीय नेते सोमाभाई मोदी यांनी केले. ते बुधवारी येथील शिवाजी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय तेली समाज आत्मसन्मान चिंतन शिबिरात विशेष पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे होत्या. तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोमाभाई मोदी यांचे सहकारी आणि तेली समाजाचे नेते निरंजन राठोड, वर्ध्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, नितीन पवाने, मंगेश रुईकर, रमेश पिसे, राजेंद्र पडोळे, नितीन पवाने, माधव घुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या भाषणातून सोमाभाई मोदी यांनी विविध सामाजिक विषयांना हात घातला. त्यामध्ये त्यांनी शिक्षणावर भर दिला. मुलगा व मुलगी दोघांनाही शिकवा. परंतु केवळ नोकरी मिळविण्याच्या हेतुने शिकवू नका तर त्यांना त्यांच्या पायावर उभे होता येईल, या हेतुने शिकवा. सुशिक्षित व्यक्ती कोणताही छोटा-मोठा व्यवसाय करेल तरी तो त्यामध्ये काहीतरी वेगळेपण सिद्ध करून दोन पैसे अधिक कमावितो. शिक्षणाचा उपयोग सर्वच स्तरावर होतो. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते तर तुम्ही ते कशापद्धतीने करता, यावर तुमचे यश अवलंबून असल्याचे ते म्हणाले. मुलांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तेली समाजामध्ये दोन गुण सर्वत्र दिसून येतात. ते म्हणजे काटकसर आणि प्रामाणिकपणा. या गुणांच्या आधारे हा समाज निश्चितच भविष्यात चांगली प्रगती करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संघटीत होऊन कार्य करा, शासनाच्या विविध जनपयोगी योजनांचा लाभ घ्या व इतरांनाही द्या, असे आव्हानसुद्धा त्यांनी यावेळी केले. समाजाने माझ्यासाठी काय केले त्यापेक्षा मी समाजासाठी काय करतो, ही भूमिका महत्वाची असल्याचेही सोमाभाई मोदी यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनीसुद्धा विचार व्यक्त केले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर रायमल, अशोक कारमोरे, वसंत भुराणे, रत्नाकर पजगाडे, ज्ञानेश्वर झाडे, संदीप गुल्हाने आदींसह अनेक तेली समाज बांधवांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)