शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

खासगी खरेदीत शेतकर्‍यांची लूट

By admin | Updated: May 12, 2014 00:17 IST

सर्व प्रकारच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे.

मुकेश इंगोले - दारव्हा

सर्व प्रकारच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. मात्र बाजार समितीकडून यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. मार्केट यार्डमध्ये लिलाव होत नसल्याने शेतकर्‍यांना नाईलाजास्तव आपला माल खासगी व्यापार्‍यांना विकावा लागतो. या व्यवहारावर कुणाचेच नियंत्रण राहात नसल्याने व्यापार्‍यांची मनमानी चालू असते. योग्य भावाअभावी शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात दारव्हा बाजार समितीमध्ये लूट होत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दारव्हा आणि ग्रामीण परिसर भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था असल्याने येथील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन घेतात. परंतु शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु दारव्हा बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची केवळ औपचारिकता पार पाडली जात असल्याने बाजार समितीचे अस्तित्व नाममात्र ठरले आहे. या सार्‍या प्रकारामुळे व्यापार्‍यांचा यार्डमध्ये येवून लिलाव पद्धतीने माल खरेदी करण्यात रस नाही. शहरातील अनेक व्यापार्‍यांनी धान्याच्या खरेदीसाठी खुलेआम दुकान थाटले आहे. त्याच ठिकाणी खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार पार पाडतात. बाजार समितीत लिलाव होत नसल्याने शेतकर्‍यांनाही नाईलाजास्तव आपला माल खासगी व्यापार्‍यांना विकावा लागतो. या व्यवहारात शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत तर नाहीच उलट वजन काट्यातूनही शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता असते. यामुळे व्यापारी मात्र चांगलीच मालसूताई करताना दिसत आहे. मालाचा लिलाव होत नसल्याने माल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होत नाही. त्यामुळे पडेल किमतीत मालाची खरेदी केल्या जाते. यातून बाजार समितीचा सेसही वाचतो. या सार्‍या प्रकारामुळे दारव्हा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. एकीकडे बाजार समितीची ही अवस्था असताना शेजारील तालुक्यातील आर्णी, नेर, कारंजा या ठिकाणी चांगले व्यवहार होतात. त्यामुळे अनेक शेतकरी आपला माल इतर ठिकाणी विकायला नेत आहे. दारव्हा बाजार समितीत लिलाव होत नसल्याच्या प्रकारामुळे याचा परिणाम इतर शहरातील मार्केट लाईनवर होत आहे. याचे बाजार समितीला कुठलेच सोयरसुतक नसून त्यांचे कर्मचारी केवळ सेस गोळा करण्यातच गुंग असतात. कापूस खरेदीचा सेस जिनिंगकडूनच मिळतो. इतर मालाच्या व्यवहारातील सेस गोळा करण्यासाठी त्यांनी व्यापार्‍यांच्या दुकानात माणसे नेमली आहे. त्यामुळे यावरच कर्मचार्‍यांचा पगार व इतर व्यवहार चालतात. जुन्या संचालक मंडळाचा कार्यकाळ १८ आॅगस्ट २०१३ ला संपला. शासनाने बाजार समितीला मुदतवाढ दिल्यामुळे सध्या सहाय्यक निबंधक प्रशासक म्हणून काम करीत आहे. संचालक मंडळ असो वा प्रशासक दारव्हा बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय होताना मात्र दिसत नाही.