शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

खासगी खरेदीत शेतकर्‍यांची लूट

By admin | Updated: May 12, 2014 00:17 IST

सर्व प्रकारच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे.

मुकेश इंगोले - दारव्हा

सर्व प्रकारच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. मात्र बाजार समितीकडून यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. मार्केट यार्डमध्ये लिलाव होत नसल्याने शेतकर्‍यांना नाईलाजास्तव आपला माल खासगी व्यापार्‍यांना विकावा लागतो. या व्यवहारावर कुणाचेच नियंत्रण राहात नसल्याने व्यापार्‍यांची मनमानी चालू असते. योग्य भावाअभावी शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात दारव्हा बाजार समितीमध्ये लूट होत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दारव्हा आणि ग्रामीण परिसर भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था असल्याने येथील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन घेतात. परंतु शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु दारव्हा बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची केवळ औपचारिकता पार पाडली जात असल्याने बाजार समितीचे अस्तित्व नाममात्र ठरले आहे. या सार्‍या प्रकारामुळे व्यापार्‍यांचा यार्डमध्ये येवून लिलाव पद्धतीने माल खरेदी करण्यात रस नाही. शहरातील अनेक व्यापार्‍यांनी धान्याच्या खरेदीसाठी खुलेआम दुकान थाटले आहे. त्याच ठिकाणी खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार पार पाडतात. बाजार समितीत लिलाव होत नसल्याने शेतकर्‍यांनाही नाईलाजास्तव आपला माल खासगी व्यापार्‍यांना विकावा लागतो. या व्यवहारात शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत तर नाहीच उलट वजन काट्यातूनही शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता असते. यामुळे व्यापारी मात्र चांगलीच मालसूताई करताना दिसत आहे. मालाचा लिलाव होत नसल्याने माल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होत नाही. त्यामुळे पडेल किमतीत मालाची खरेदी केल्या जाते. यातून बाजार समितीचा सेसही वाचतो. या सार्‍या प्रकारामुळे दारव्हा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. एकीकडे बाजार समितीची ही अवस्था असताना शेजारील तालुक्यातील आर्णी, नेर, कारंजा या ठिकाणी चांगले व्यवहार होतात. त्यामुळे अनेक शेतकरी आपला माल इतर ठिकाणी विकायला नेत आहे. दारव्हा बाजार समितीत लिलाव होत नसल्याच्या प्रकारामुळे याचा परिणाम इतर शहरातील मार्केट लाईनवर होत आहे. याचे बाजार समितीला कुठलेच सोयरसुतक नसून त्यांचे कर्मचारी केवळ सेस गोळा करण्यातच गुंग असतात. कापूस खरेदीचा सेस जिनिंगकडूनच मिळतो. इतर मालाच्या व्यवहारातील सेस गोळा करण्यासाठी त्यांनी व्यापार्‍यांच्या दुकानात माणसे नेमली आहे. त्यामुळे यावरच कर्मचार्‍यांचा पगार व इतर व्यवहार चालतात. जुन्या संचालक मंडळाचा कार्यकाळ १८ आॅगस्ट २०१३ ला संपला. शासनाने बाजार समितीला मुदतवाढ दिल्यामुळे सध्या सहाय्यक निबंधक प्रशासक म्हणून काम करीत आहे. संचालक मंडळ असो वा प्रशासक दारव्हा बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय होताना मात्र दिसत नाही.