शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

जमीन शेतकऱ्यांची, पाणी उद्योगांना

By admin | Updated: August 23, 2015 02:37 IST

धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे.

सिंचन शोधयात्रेने मांडले वास्तव : पेंटिंग आणि पथनाट्यातून राज्यभरात करणार जनजागृतीयवतमाळ : धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे. असाच छुपा अजेंडा राज्यशासनाचा आहे. यातून शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतीच श्रीमंत झाले. सरकार बदलले तरी प्रकल्पांबाबतचे धोरण तसेच आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जनमंचच्या वतीने सिंचन शोधयात्रेचे आयोजन करण्यात आले. गत चार महिन्यांपासून सुरू असलेली ही शोधयात्रा यवतमाळात दाखल झाली आहे.शनिवारी यवतमाळच्या पाचकंदिल चौकात जनमंचच्या सिंचन शोधयात्रेने विशेष पेंटिंग साकारली. त्यातून सिंचनाचा प्रश्न सर्वांपुढे मांडला. ही छायाचित्रे पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जनमंचच्या वतीने प्रकल्पांच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले. प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला आहे. यातून प्रकल्पाच्या कॅनॉलसह प्रकल्पाला हादरा बसला आहे. यामुळे आजही प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट प्राप्त करता आलेच नाही. आजही धरणातून पूर्ण क्षमतेने ओलित होत नाही.जलप्रकल्पाचे वास्तव शोधण्यासाठी जनमंचच्या कार्यकर्त्यांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांपासून जनमंचने हा उपक्रम हाती घेतला आहे. दर १५ दिवसांनी एका प्रकल्पाला भेट दिली जाते. त्या ठिकाणची माहिती छायाचित्ररूपात गोळा करण्यात येते. आतापर्यंत अशा सात प्रकल्पांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तुरागोंदी, लोअर वर्धा, वठाजी पिंपळगाव, कार, सतरापूर, अंभोरा आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा जनमंचच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. या प्रकल्पावर हजारो कोटी रुपये खर्च झाले. हे काम निकृष्ट आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. ही संपूर्ण माहिती विदर्भ सिंचन मंडळाकडे सादर करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निकृष्ट कामाचे प्रदर्शन मुंबईला लावण्यात आले होते. लवकरच विदर्भातील विविध शहरांमध्येही हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. जनमानसात प्रकल्पाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. जनमंचचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूरच्या चित्रकारांचा अलग अँगल ग्रुप, वर्धेचा पथनाट्य ग्रुप एकत्र आला आहे. यावेळी जनमंचचे अध्यक्ष सुरेश शिंदे पाटील, मिली विकमसी, भारती तिवारी, पलक अग्रवाल, पलाश शंकर, प्रवीण चांदेवार, रिद्धी विकमसी, मुकंद बावणे, श्रीकांत परबत, विवेक कवठेकर, राजेश चव्हाण, रवी काळे, मोहन चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)