शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

१० वर्षे लोटली, पुनर्वसनाचा प्रश्न कायम

By admin | Updated: July 9, 2015 02:36 IST

नागरिकांना नेहमी दक्ष राहण्यास सांगणारी नगरपरिषद ९ जुलै रोजी स्वत:च बेसावध राहिल्याने शहरापासून सात किमी

प्रशासनाचे दुर्लक्ष : नांदगाव धरण बांधल्यास अर्ध्या शहराला होऊ शकतो पाणीपुरवठादिग्रस : नागरिकांना नेहमी दक्ष राहण्यास सांगणारी नगरपरिषद ९ जुलै रोजी स्वत:च बेसावध राहिल्याने शहरापासून सात किमी अंतरावरील नांदगव्हाण धरणाची कडा कोसळल्याने दिग्रस शहरामध्ये हाहाकार उडाला होता. ९५२ कुटुंबासह शहराच्या अर्ध्या भागातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन कशीबशी काढली. तरीसुद्धा चौघा जणांचा बळी घेऊनच महापूर शांत झाला. त्यावेळी बेघर झालेले शेकडो कुटुंब आजही मरणयातना सहन करीत रस्त्यावर जगत आहेत. शासनाने नगरपरिषदेच्या माध्यमातून ८५२ कुटुंबीयांना घरकूल देण्याच्या उद्देशाने काही कार्य सुरू केले. परंतु मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. याच प्रवृत्तीमुळे १० वर्ष लोटूनसुद्धा हाच प्रश्न कायम आहे. ९ जुलै २००५ चा तो दिवस आजही अनेकांना आठवतो. २००४ साली पाऊस कमी झाल्याने नागरिक चिंतेत होते. अशातच ८ जुलै २००५ रोजी शहरासह संपूर्ण तालुक्यात धो-धो पाऊस पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. पडलेल्या पावसामुळे शहरातील धावंडा व मोरना नदीला पूर आला. बऱ्याच दिवसानंतर आलेल्या पुराला पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. रात्रीचे ९ वाजता देखील अनेक जण पूर पाहण्यासाठी धावंडा नदी तीरी जमले होते. परंतु त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. अचानक धावंडा व मोरना नदीने उग्र रूप धारण करून दिशाहीन प्रवाह सुरू करून देवनगर, जिजामाता नगर, पोळा मैदान, जिनगरपुरा, बैद्यनाथ नगर, संभाजी नगर, मोती नगर, गंगानगर, विठ्ठल नगर, शास्त्रीनगर आदी भागात महापूर शिरला. अनेकांचे पाळीव प्राणी, घरातील मौल्यवान वस्तू, अन्नधान्य व इतर साहित्य वाहून गेले. १४ निष्पाप नागरिकांचा बळीसुद्धा या महापुराने घेतला. १४ बळी जाणाऱ्या कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, त्यांचा आक्रोश गगनाला भिडत होता. नगरपरिषदेने कोणतीही सावधगिरीची सूचना दिली नव्हती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या भिंतीवर कचरा व गाळ जमा झाल्याने पाण्याचा प्रचंड दाबाने धरणाच्या कडा कोसळल्या आणि त्यामुळेच धावंडा नदीला महापूर आला होता. ९५२ कुटुंब यामध्ये बेघर झाले, अद्यापही ते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या धाराशाही पडलेल्या नांदगव्हाण धरणाचे पुनर्वसन आवश्यक झाले आहे. नांदगव्हाण धरण पुन्हा एकदा बांधल्यास कोणताही खर्च न करता अर्ध्या शहराला या धरणाच्या पाण्याचा पुरवठा दररोज करता येऊ शकतो. उर्वरित अर्ध्या शहराला अरुणावती धरणामधील पाण्याचा पुरवठा करता येऊ शकतो. हे धरण पुन्हा बांधल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेलच शिवाय दिग्रस शहराची पाण्याची समस्या सुटेल. अनेक शेतांचे सिंचनसुद्धा होऊ शकेल. (प्रतिनिधी)