शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

By admin | Updated: January 23, 2015 00:10 IST

तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

पुसद : तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अधिसूचना काढल्याने २१ गावांतील नागरिकांनी जवळा येथे वन्यजीव अभयारण्याच्या जाचक अटींची होळी केली. जवळा येथे माळपठारावरील २१ गावांच्या नागरिकांनी एकत्र येऊन इसापूर येथे वन्यजीव अभयारण्य होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. वन्यजीव अभयारण्यामुळे २१ गावांतील जनजीवन प्रभावित होणार असून अभयारण्य निर्मितीच्या तब्बल १५० जाचक अटींमुळे २५ ते ३० हजार रहिवाशांचे जीवन जगणे कठीण होणार आहे. माळपठार संघर्ष समितीचे जवळा येथील सुधाकर कांबळे म्हणाले, अभयारण्यामुळे येथील अडीच किलोमीटर परिसरात रहिवाशांना चूल पेटविता येणार नाही. तसेच कुऱ्हाडबंदी, जनावरांना चराईबंदी, पीक फवारणी बंदी, विहीर व विंधन विहिरी खोण्यावर बंदी आदी अटी आहेत. त्यामुळे नागरिकांना जगणे कठीण होईल असे ते म्हणाले. आधिच धरणामुळे या २१ गावांचे १९८२ मध्ये पुनर्वसन झाले. त्यामुळे या गावांचा विकास खुंटलेला आहे. ३१ वर्षात विकास झाला नसताना अभयारण्याचे नवे संकट गावकऱ्यांवर कोसळले आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार पक्षी अभयारण्याला गावकऱ्यांचा विरोध नसल्याचे रामदास कांबळे (जवळा) यांनी सांगितले. मात्र वन्यजीव अभयारण्याला २१ गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचा निर्णय यावेळी गावकऱ्यांच्या झालेल्या सभेत एकमुखाने घेण्यात आला. येत्या २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत वन्यजीव अभयारण्याच्या उभारणीचा निर्णय रद्द करण्यात यावा, असा ठराव घेण्यात येणार असल्याचे सुधाकर कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यावेळी मधुकर कलिंदर,, विलास खंदारे, ज्ञानेश्वर मस्के, मोहन आडे, गुलाब गडदे, गोविंदराव ढुमणे, जयानंद भालेराव, नंदू काकडे, बाळू होडगीर, तुकाराम खोकले, गजानन कुकडे, मारोती घाटे, जयवंता मस्के, प्रफुल्ल धुळे, पिंटू इंगोले, उत्तम मस्के, संतोष पांडे, बळीराम माहुरे, दिगांबर दवणे, रामदास कांबळे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)