शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अत्यल्प प्रवास भत्त्याचा केंद्र प्रमुखांना भुर्दंड

By admin | Updated: February 5, 2015 23:16 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागात १९९५ मध्ये केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली. केंद्रातील शाळांना गाठीभेटी, वर्गनिरीक्षण, मार्गदर्शन तासिका, गुणवत्ता विकास उपक्रम,

नेर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात १९९५ मध्ये केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली. केंद्रातील शाळांना गाठीभेटी, वर्गनिरीक्षण, मार्गदर्शन तासिका, गुणवत्ता विकास उपक्रम, शाळेचे रेकॉर्ड नियंत्रण अशा प्रमुख जबाबदाऱ्या केंद्र प्रमुखाकडे सोपविण्यात आल्या. यासाठी केंद्र प्रमुखाला प्रवास भत्ता लागू करण्यात आला. मात्र त्यावेळी मंजूर केलेले २०० रुपये प्रवास भत्ता आजही कायम आहे. वाढत्या महागाईत हे केंद्र प्रमुखांना शक्य होत नाही. केंद्र प्रमुखाकडे इयत्ता नववी ते अकरावीपर्यंत शाळांचा समावेश असतो. प्रत्येक शाळांना आठवड्यातून दोनदा भेटी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. महिनाभराचा विचार केल्यास केंद्र प्रमुखाला २० दिवस प्रवास करावा लागतो. या मोबदल्यात त्यांना केवळ २०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. या तुलनेत राज्य शासनातील इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरपूर असा प्रवासी भत्ता दिला जातो. मात्र केंद्र प्रमुखाच्या वाट्यालाच उपेक्षा आली आहे. केंद्र प्रमुख संघटनेने प्रवास भत्ता वाढविण्याची मागणी लावून धरली होती. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शाळांना भेटी देणे, गुणवत्ता विकास मार्गदर्शन, विविध उपक्रमांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा ते पंचायत समिती असा प्रवास केंद्र प्रमुखाला करावा लागतो. या उपरही वरिष्ठांकडून नोटीस बजावली जाते. प्रवास भत्ता अत्यल्प असल्याने केंद्र प्रमुखांनाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कागदपत्रांची पूर्तता करतानाच वरिष्ठांचे बोलणे खावे लागते. त्यामुळे केंद्र प्रमुख त्रस्त आहे. या शिवाय तालुक्यातील राजकीय व्यक्तींकडून केंद्र प्रमुखाकडे विविध कार्यक्रमांसाठी वर्गणी मागितली जाते. वर्गणी दिली नाही तर कारवाईचा धाक दाखविला जातो. केंद्र प्रमुख हा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शाळा यात समन्वय साधणारा घटक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचीच उपेक्षा होत आहे. केंद्र प्रमुखाच्या प्रवास भत्त्यात लवकरात लवकर वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)