शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘मेडिकल’मध्ये रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरू

By admin | Updated: August 10, 2016 01:10 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तघटक विलगीकरण केंद्राला अखेर मान्यात मिळाली.

दीर्घ प्रतीक्षा : प्लाझमा, प्लेटलेट, लाल पेशी आदी घटक मिळणार यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तघटक विलगीकरण केंद्राला अखेर मान्यात मिळाली. या केंद्रासाठी रुग्णालय प्रशासन २००९ पासून सातत्याने पाठपूरावा केला जात होता. अनेक अडचणींवर मत करत अखेर या केंद्राला अन्न व औषधी प्रशासन विभागाने मान्यता दिली. त्यामुळे विविध रक्त घटक गरजेनुसार उपलब्ध होणार आहे. एका रक्त पिशवीतून प्रामुख्याने तीन घटक वेगळे करता येते. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यांच्या आजारानुसार लाभ देतात येतो. ग्रामीण भागातील रुग्णामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असते. महिलांमध्ये ही समस्या सर्वाधिक दिसून येते. अशा महिलांना आता लाल रक्तपेशी उपलब्ध करून देता येणार आहे. मानवी रक्तानेच माणसाचा जीव वाचविता येतो. त्यामुळे मानवी रक्ताची उपयोगिता वाढविणे आवश्यक होते. शिवाय रक्त घटक विलगीकरण केंद्र असल्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता देणार नाही, अशी अट भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने घातली होती. सातत्याने हमी पत्र देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू होता. कोणत्याही परिस्थीत हे केंद्र निर्माण व्हावे यासाठी पॅथोलॉजी विभागाकडून प्रयत्न सुरू होतो. मात्र अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या क्लिष्ट निकषांची पुर्तता करता करता तब्बल सहा वर्षांचा कालावधी लोटला. आता एप्रिल पासून विलगीकरण केंद्रात रक्त घटक मिळत आहे. येथील घटकांची गुणवत्ता तपासली जात आहे. खास करून प्लेटलेट मध्ये असलेल्या पेशी प्रमाण किती, त्याचा रुग्णावर परिणाम होतो की नाही, याची चाचपणी सुरू आहे. तब्बल ३० लाखांची अद्ययावत मशनरी या केंद्रात आहे. आता पर्यंंत प्लेटलेट आणि प्लाझमा मिळविण्यासाठी नागपूरकडे धाव घ्यावी लागत होती. त्यासाठी गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. ही सुविधा शासकीय रुग्णालयातच मिळत असल्याने फायदा होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) महाविद्यालय प्रशासनाची चुप्पी सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्वाची सुविधा रक्त घटक विलगीकरण केद्रांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने जाणीवपूर्वक दडपली आहे. इतकेच नव्हे तर हे केंद्र सुरू झाल्याची माहिती दिल्यास करावाई करण्यात येईल, अशी तंबी दिली. लोकहिताची माहिती दडविण्यामागे प्रशासनाचा नेमका उद्देश काय, अशी शंका व्यक्त होत आहे.