शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या ताटातून तूर डाळ गायब

By admin | Updated: December 28, 2015 02:54 IST

राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे.

नोव्हेंबरपासून पुरवठा बंद : शालेय पोषण आहाराला महागाईचा फटकायवतमाळ : राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या कोट्यात तूरडाळच नाही. त्यामुळे वरण-भात या आवाडत्या आहारापासून शोलय विद्यार्थी वंचित आहेत.जिल्ह्यातील २ हजार १०९ शाळांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात पोषण आहारासाठी जे धान्य पुरविण्यात आले, त्यात तूरडाळीचा पत्ताच नाही. महागाईमुळे तूरडाळ देण्यात आली नसल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. परंतु, तूरडाळ वजा करताना त्याऐवजी दुसरा कुठलाही पदार्थ वाढविण्यात आलेला नाही, त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवेळी येणाऱ्या मूगडाळीमध्ये किंचतशी वाढ करण्यात आली आहे. परंतु, तूरडाळीच्या वरणासोबत भात आवडीने खाणारे विद्यार्थी मूगडाळीकडे बघायला तयार नाही, त्यामुळे आहार शिजविणाऱ्यांची मात्र गोची होत आहे. शाळांमध्ये पोषण आहार देण्याविषयी आठवडाभराचे वेळापत्रक शासनानेच ठरवून दिले आहे. त्यानुसार प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांना तूरडाळीचे वरण देणे बंधनकारक आहे. सोमवारी तूरडाळ, मंगळवारी वाटाणे, बुधवारी मूगडाळ, गुरुवारी वाटाणे, शुक्रवारी चवळी, शनिवारी वाटाणे देण्याचा शिरस्ता नोव्हेंबरपर्यंत कायम होता. मात्र, नोव्हेंबरच्या कोट्यात तूरडाळच न आल्याने सोमवारच्या आहारात काय द्यावे, हा प्रश्न आहे. नाईलाजाने शिक्षक दररोजच्या आहारात विद्यार्थ्यांना मूगडाळ किंवा वाटाणेच देत आहेत. विद्यार्थ्यांचा आवडता वरण-भात मिळत नसल्याने शिक्षकांना प्रसंगी पदरमोड करून तूरडाळ घ्यावी लागत आहे. होतकरू शिक्षकांना त्यासाठी आर्थिक चणचण भोगावी लागत आहे. बाजारपेठेत तूर डाळीचे किरकोळ विक्रीचे दर सध्या १८० रुपये किलोप्रमाणे आहे. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहेत. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या मुलांना आपल्या घरातही तूर डाळीचा आस्वाद घेणे महागाईमुळे दुर्लभ झाले आहे. शाळेतील पोषणहारात मात्र त्यांना तूर डाळीचे आवडते वरण हमखास मिळत होते. मात्र आता पोषण आहाराच्या कोट्यातही तूरडाळ वगळण्यात आल्याने तूरडाळीच्या ऐवजी मूग डाळीच्या वरणावर त्यांचे भलावण केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पोषण आहाराचा कंत्राट वर्षभरापूर्वीचा आहे. त्यावेळच्या बाजारातील दरानुसारच प्रतिलाभार्थी खर्च ठरलेला आहे. त्याच्या आधीन राहूनच विद्यार्थ्यांना धान्य पुरविले जाते. रोज प्रत्येक विद्यार्थ्याला २० ग्रॅम धान्य देणे आवश्यक आहे. या निकषामध्ये सध्याच्या भावानुसार तूरडाळ बसत नाही. मात्र या पुढील कोट्यामध्ये तूरडाळीचा समावेश करण्याचा प्रयत्न राहील.- राजेश मनवरअधीक्षक, शालेय पोषण आहार