शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

शालेय विद्यार्थ्यांच्या ताटातून तूर डाळ गायब

By admin | Updated: December 28, 2015 02:54 IST

राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे.

नोव्हेंबरपासून पुरवठा बंद : शालेय पोषण आहाराला महागाईचा फटकायवतमाळ : राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या कोट्यात तूरडाळच नाही. त्यामुळे वरण-भात या आवाडत्या आहारापासून शोलय विद्यार्थी वंचित आहेत.जिल्ह्यातील २ हजार १०९ शाळांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात पोषण आहारासाठी जे धान्य पुरविण्यात आले, त्यात तूरडाळीचा पत्ताच नाही. महागाईमुळे तूरडाळ देण्यात आली नसल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. परंतु, तूरडाळ वजा करताना त्याऐवजी दुसरा कुठलाही पदार्थ वाढविण्यात आलेला नाही, त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवेळी येणाऱ्या मूगडाळीमध्ये किंचतशी वाढ करण्यात आली आहे. परंतु, तूरडाळीच्या वरणासोबत भात आवडीने खाणारे विद्यार्थी मूगडाळीकडे बघायला तयार नाही, त्यामुळे आहार शिजविणाऱ्यांची मात्र गोची होत आहे. शाळांमध्ये पोषण आहार देण्याविषयी आठवडाभराचे वेळापत्रक शासनानेच ठरवून दिले आहे. त्यानुसार प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांना तूरडाळीचे वरण देणे बंधनकारक आहे. सोमवारी तूरडाळ, मंगळवारी वाटाणे, बुधवारी मूगडाळ, गुरुवारी वाटाणे, शुक्रवारी चवळी, शनिवारी वाटाणे देण्याचा शिरस्ता नोव्हेंबरपर्यंत कायम होता. मात्र, नोव्हेंबरच्या कोट्यात तूरडाळच न आल्याने सोमवारच्या आहारात काय द्यावे, हा प्रश्न आहे. नाईलाजाने शिक्षक दररोजच्या आहारात विद्यार्थ्यांना मूगडाळ किंवा वाटाणेच देत आहेत. विद्यार्थ्यांचा आवडता वरण-भात मिळत नसल्याने शिक्षकांना प्रसंगी पदरमोड करून तूरडाळ घ्यावी लागत आहे. होतकरू शिक्षकांना त्यासाठी आर्थिक चणचण भोगावी लागत आहे. बाजारपेठेत तूर डाळीचे किरकोळ विक्रीचे दर सध्या १८० रुपये किलोप्रमाणे आहे. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहेत. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या मुलांना आपल्या घरातही तूर डाळीचा आस्वाद घेणे महागाईमुळे दुर्लभ झाले आहे. शाळेतील पोषणहारात मात्र त्यांना तूर डाळीचे आवडते वरण हमखास मिळत होते. मात्र आता पोषण आहाराच्या कोट्यातही तूरडाळ वगळण्यात आल्याने तूरडाळीच्या ऐवजी मूग डाळीच्या वरणावर त्यांचे भलावण केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पोषण आहाराचा कंत्राट वर्षभरापूर्वीचा आहे. त्यावेळच्या बाजारातील दरानुसारच प्रतिलाभार्थी खर्च ठरलेला आहे. त्याच्या आधीन राहूनच विद्यार्थ्यांना धान्य पुरविले जाते. रोज प्रत्येक विद्यार्थ्याला २० ग्रॅम धान्य देणे आवश्यक आहे. या निकषामध्ये सध्याच्या भावानुसार तूरडाळ बसत नाही. मात्र या पुढील कोट्यामध्ये तूरडाळीचा समावेश करण्याचा प्रयत्न राहील.- राजेश मनवरअधीक्षक, शालेय पोषण आहार