शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

अल्प उतारीने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 11, 2015 00:42 IST

यावर्षी शेतीला पावसाने दगा दिल्याने सोयाबीनला अत्यल्प एकरी एक ते दोन पोते उतारी आली आहे. सोयाबीनच्या पिकाची उतारी बघून आता वर्षभर जगावे कसे, ....

सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले, सणांवर पडले विरजणमारेगाव : यावर्षी शेतीला पावसाने दगा दिल्याने सोयाबीनला अत्यल्प एकरी एक ते दोन पोते उतारी आली आहे. सोयाबीनच्या पिकाची उतारी बघून आता वर्षभर जगावे कसे, या विचाराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या मिळणाऱ्या उतारीने व कमी भावाने शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडाला आहे.यावर्षी शेती हंगामाच्या सुरूवातीला मृग नक्षत्र चांगले बरसल्याने कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरण्या साधल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या काळात असतानाच पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे पीक सुकून गेले आणि शेंगामधील दाणा झिरमीटला. त्यामुळे आता सोयाबीन काढताना एकरी एक ते दोन पोत्याची उतारी मिळत आहे. सोयाबीन पिकाला मिळणारी उतारी बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळून गेले आहे. सोयाबीनच्या कापणीसाठी मजूर एकरी एक हजार ५०० ते एक हजार ६०० रूपये घेतात. यंत्राने सोयाबीन काढासाठी लागणारा खर्च वेगळाच असतो. त्यामुळे सोयाबीनच्या कापणीला व काढणीला लागणारा खर्चही निघत नसल्याने काही शेतकरी उभे पीक पेटवून देत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाच्या उतारीत घट आल्याने आणि पिकाच्या उत्पादनातून भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याचा आता सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडून गेला आहे.पाण्याच्या कमतरतेने सोयाबीनचे पीक करपून गेल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे सोयाबीनपासून मिळणारे कुटारही यावर्षी अत्यल्प आहे. सोयाबीनच्या कुटाराचा चारा म्हणून शेतकऱ्यांना वर्षभर उपयोग होत होता. परंतु पिकाची वाढ न झाल्याने आणि शेंगा न लागल्याने, आता सोयाबीनपासून कुटारही न मिळाल्यातच जमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या घरात सणांवरही विरजण पडणार आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)