शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

यवतमाळच्या वाढीव क्षेत्रात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 12, 2017 00:02 IST

नगरपरिषदेच्या वाढीव क्षेत्रामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे.

नगरपरिषद उदासीन : अद्यापही टंचाई कृती आराखडा नाही यवतमाळ : नगरपरिषदेच्या वाढीव क्षेत्रामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. मात्र त्यानंतरही नगरपरिषदेने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केलेला नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष देण्याऐवजी नगरपरिषदेचे पदाधिकारी आपल्याला मिळणाऱ्या सोई-सुविधांसाठी हट्ट धरुन असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यवतमाळ नगरपरिषदेचे कार्यक्षेत्र वाढले आहे. वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, डोर्ली, मोहा, भोसा, उमरसरा आदी ग्रामपंचायती नगरपरिषदेमध्ये समाविष्ठ झाल्या आहेत. पूर्वी या ग्रामपंचायतींसाठी जिल्हा परिषदेचा मार्चमध्येच पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जात होता. पंचायत समिती व ग्रामपंचायतीमार्फत त्याची अंमलबजावणी केली जात होती. ग्रामसेवक, बीडीओ तसेच संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे त्यावर नियंत्रण राहत होते. परंतु या ग्रामपंचायती आता नगरपरिषद हद्दीत समाविष्ठ झाल्या असूनही अद्याप त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणीटंचाईचा विचार केला गेलेला नाही. शहराच्या मध्यवस्तीपेक्षा या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. परंतु नगरपरिषदेने अद्याप त्यासाठी साधा कृती आराखडाही तयार केलेला नाही. त्यामुळे तेथे पाण्याचे टँकर पोहोचणार केव्हा असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढीव क्षेत्रातील या पाणीटंचाईच्या वनव्यात संबंधित लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन लगतच्या भविष्यात पोळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपरिषदेमध्ये अध्यक्ष सेनेचा आणि बहुमत भाजपाचे अशी स्थिती आहे. त्यामुळे नगरविकासाच्या कामांमध्ये राजकारण आणून अडथळे निर्माण केले जात आहे. जनविकासाच्या एखाद्या मुद्यावर नगराध्यक्ष आग्रही असतील तर भाजपाचे सदस्य जाणीवपूर्वक त्यात आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. भाजपा-सेनेच्या या राजकारणात शहर विकासाचा बँड वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)चक्क अभियंत्याच्या कक्षात अतिक्रमणयवतमाळ नगरपरिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांची सध्या कक्षासाठी (चेंबर) रस्सीखेच सुरू आहे. पदाधिकाऱ्यांना तिसऱ्या माळ्यावर कक्ष देण्यात आले आहे. मात्र तेथे जनसंपर्क होत नाही, नागरिक भेटायला येऊ शकत नाही म्हणून या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या माळ्यावर कक्ष हवे आहेत. जनतेला तिसऱ्या माळ्यावर पाठवावे, असा त्यांचा आग्रह आहे. वयोवृद्ध मंडळी तिसऱ्या माळ्यापर्यंत पायऱ्या चढत जाऊ शकेल का याचा विचारही केला जात नाही. लिफ्ट आहे, पण त्यात गोरगरिबांना प्रतिबंध केला जातो. त्याची क्षमताही अवघ्या चार व्यक्तींची आहे. जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी जनतेपेक्षा स्वत:चा स्वार्थ अधिक पाहत असल्याचे यावरून स्पष्ट होते. दुसऱ्या माळ्याचा तिढा न सुटल्याने दोन पदाधिकाऱ्यांनी अखेर एका अभियंत्याच्या कक्षाचा ताबा घेतल्याची महिती आहे. या अभियंत्याला तिसऱ्या माळ्यावर जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.