शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पुसदमध्ये सात दिवासानंतरही दत्त मंदिर अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

पुसद : शहरातील मोतीनगर स्थित दत्त मंदिराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे १२ मार्चपासून मंदिर अंधारात बुडाले आहे. ...

पुसद : शहरातील मोतीनगर स्थित दत्त मंदिराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे १२ मार्चपासून मंदिर अंधारात बुडाले आहे. संस्थान समितीच्या गलथान कारभारामुळे ही वेळ ओढवली आहे.

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मोतीनगरमधील अतिशय पुरातन आणि जागृत दत्त मंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिराचे दोन्ही प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून बंद आहे. आता वीजही कापली गेल्याने कमिटीला मंदिरच बंद करायचे की काय, असा प्रश्न भक्त विचारत आहे. श्री दत्त मंदिर ट्रस्टचे आधीचे सर्व सदस्य बदलवून नवीन सदस्य घेऊन मोक्याच्या ठिकाणची जागा हस्तगत करण्याच्या उद्देशाने गठित कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे आहेत.

इतर सदस्यांपैकी केवळ एकाच कुटुंबातील तीन-चार सदस्यांना कार्यकारिणीत घेऊन एकाच कुटुंबाचा एकछत्री कारभार दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये साध्या पद्धतीने पार पडलेल्या दत्त जन्म उत्सवातदेखील गलथान कारभार झाल्याची भक्तांची तक्रार आहे. महाप्रसाद नसल्याने यावर्षी कुणीही मंदिराला शिधा किंवा धान्य देऊ नये म्हणून समितीने मोठे फलक लावले होते. मात्र, अनेक भक्तांकडून अन्नदानाच्या गोंडस नावाखाली पावत्या फाडून आणि अन्नदान न करून एकप्रकारे भक्तांची फसवणूक केल्याचा आरोपही होत आहेत. दत्तमूर्तीला तीन-चार वर्षांपासून रंग दिलेला नाही. संस्थानचे सर्व व्यवहार केवळ 'त्या' कुटुंबाच्या एकाच व्यक्तीच्या हाती आहेत. ती व्यक्ती मात्र ‘तो मी नव्हेच‘ या अविर्भावात नामानिराळे राहते. पूर्वी मंदिराच्या नावाने असलेले वीज मीटर या महाशयांनी स्वतःच्या नावाने करून घेतल्याने शंकेची पाल चुकचुकते. आजपर्यंत एकही संस्थानसंदर्भातील बैठक मंदिरात न घेता त्यांच्या घरी उरकली जाते. दानपेटीतील सर्व पैशांचीही घरीच मोजदाद होते. कुणाला संस्थानची जागा भाड्याने द्यायची, काय भाडे घ्यायचे तसेच संस्थानबाबत काय निर्णय घ्यायचे, हे सर्व त्यांच्याकडूनच सुचविले जाते.

संस्थानच्या जमिनीवर एक मोटार गॅरेज भाड्याने दिलेले असून, इतर काही सामानही भाडेतत्त्वावर ठेवल्याचे समजते. एका खासगी शाळेच्या गाड्याही मंदिर परिसरात उभ्या असायच्या. याबाबत किती भाडे संस्थानला मिळाले किंवा कुणाला यातून किती वैयक्तिक लाभ झाला, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. राजकीय पुढारीपण मिरवणारे काही नेते या कमिटीमध्ये सामील असून, त्या सर्वांच्या संगनमताने होणाऱ्या निर्णयामुळे संस्थानचे वाटोळे होत आहे. निस्सीम भक्तांच्या भावनांना नाहक ठेच पोहोचत आहे. कमिटीविरोधात प्रचंड संताप आणि रोष व्यक्त केला जात आहे. या जुन्या मंदिराच्या त्वरित जीर्णोद्धाराची गरज असून, पडझडीसंदर्भात एखादी अप्रिय घटना घडल्यास समिती जबाबदारी घेणार का, या आणि अशा अनेक समस्यांबाबत आवाज उठवून प्रसंगी या कमिटीची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याची मागणी दत्तभक्तांमधून जोर धरत आहे.