शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

दोन अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना डांबले

By admin | Updated: May 9, 2014 01:35 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांचा गुरुवारी मांगलादेवी येथे उद्रेक झाला.

मांगलादेवी येथील प्रकार : वीज वितरणच्या अनागोंदीने उद्रेकविनोद कापसे■ मांगलादेवीवीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांचा गुरुवारी मांगलादेवी येथे उद्रेक झाला. दोन अभियंत्यासह कर्मचार्‍यांना चक्क कार्यालयातच डांबले. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर अभियंते आणि कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले. या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे आठ गावांचा कारभार पाहण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून येथील कारभार ढेपाळला आहे. वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेषराव ढेंगे या शेतकर्‍याला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही वीज वितरणच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. उलट मांगलादेवी परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त अधिकचे भारनियमन करण्यात येते. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ाने पंखेही फिरत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. येथील रोहित्राची स्थितीही दयनीय आहे. साधी वार्‍याची झुळूक आली तरी तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. या परिस्थितीमुळे गावकर्‍यांना १५ दिवसातून एकदा पाणी मिळते. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. सहायक अभियंता सतीश कानडे यांनी वारंवार कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांना सूचना दिल्या. परंतु त्यांचेही ऐकले नाही. शेवटी सहायक अभियंता सतीश कानडे स्वत: गुरुवारी मांगलादेवी येथे आले. हा प्रकार गावकर्‍यांना माहीत झाला. गावकरीही त्या ठिकाणी उपस्थित झाले. कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांनी गावकर्‍यासमोरच माझी बदली करा, मला येथे काम करायचे नाही, असे अधिकार्‍याला ठणकावून सांगितले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. काही कळायच्या आतच गावकर्‍यांनी दोन अभियंते आणि कार्यालयात उपस्थित कर्मचार्‍यांना आतमध्ये डांबले. जोपर्यंत यवतमाळवरून कार्यकारी अभियंता येणार नाही तोपर्यंत दार उघडणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. संपूर्ण गाव वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपस्थित झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दारव्हाचे ठाणेदार सदानंद मानकर, नेरचे उपनिरीक्षक युनुस शेख, जमादार राजेश चौधरी आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर उपकार्यकारी अभियंता भगिरथ साहू, कार्यकारी अभियंता पी.बी. पाठक यांनी नागरिकांची समजूत काढली. लवकरच परिस्थिती सुधारण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नागरिक शांत झाले. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे दार उघडले. नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याने सर्वत्र खळबळ उडाली.