शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

दोन अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना डांबले

By admin | Updated: May 9, 2014 01:35 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांचा गुरुवारी मांगलादेवी येथे उद्रेक झाला.

मांगलादेवी येथील प्रकार : वीज वितरणच्या अनागोंदीने उद्रेकविनोद कापसे■ मांगलादेवीवीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांचा गुरुवारी मांगलादेवी येथे उद्रेक झाला. दोन अभियंत्यासह कर्मचार्‍यांना चक्क कार्यालयातच डांबले. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर अभियंते आणि कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले. या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे आठ गावांचा कारभार पाहण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून येथील कारभार ढेपाळला आहे. वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेषराव ढेंगे या शेतकर्‍याला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही वीज वितरणच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. उलट मांगलादेवी परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त अधिकचे भारनियमन करण्यात येते. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ाने पंखेही फिरत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. येथील रोहित्राची स्थितीही दयनीय आहे. साधी वार्‍याची झुळूक आली तरी तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. या परिस्थितीमुळे गावकर्‍यांना १५ दिवसातून एकदा पाणी मिळते. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. सहायक अभियंता सतीश कानडे यांनी वारंवार कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांना सूचना दिल्या. परंतु त्यांचेही ऐकले नाही. शेवटी सहायक अभियंता सतीश कानडे स्वत: गुरुवारी मांगलादेवी येथे आले. हा प्रकार गावकर्‍यांना माहीत झाला. गावकरीही त्या ठिकाणी उपस्थित झाले. कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांनी गावकर्‍यासमोरच माझी बदली करा, मला येथे काम करायचे नाही, असे अधिकार्‍याला ठणकावून सांगितले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. काही कळायच्या आतच गावकर्‍यांनी दोन अभियंते आणि कार्यालयात उपस्थित कर्मचार्‍यांना आतमध्ये डांबले. जोपर्यंत यवतमाळवरून कार्यकारी अभियंता येणार नाही तोपर्यंत दार उघडणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. संपूर्ण गाव वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपस्थित झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दारव्हाचे ठाणेदार सदानंद मानकर, नेरचे उपनिरीक्षक युनुस शेख, जमादार राजेश चौधरी आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर उपकार्यकारी अभियंता भगिरथ साहू, कार्यकारी अभियंता पी.बी. पाठक यांनी नागरिकांची समजूत काढली. लवकरच परिस्थिती सुधारण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नागरिक शांत झाले. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे दार उघडले. नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याने सर्वत्र खळबळ उडाली.