शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
4
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
5
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
6
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
7
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
8
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
9
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
10
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
11
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
12
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
13
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
14
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
15
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
16
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
18
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
19
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
20
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

नऊ जणांनी अनुभवला भूकंपाचा थरार

By admin | Updated: April 30, 2015 00:00 IST

पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत होतो. काही कळायच्या आत जोरदार कडकडाट झाला.

चाणीचे युवक सुखरुप पोहोचले : काठमांडूच्या पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेतानाच बसला भूकंपाचा हादरा, महाराष्ट्र सदनातून झाली मदतीबाबत विचारणा रूपेश उत्तरवार यवतमाळ पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत होतो. काही कळायच्या आत जोरदार कडकडाट झाला. पायाखालची जमीन हलायला लागली. काही क्षण तर आतंकवादी हल्ला असावा असे वाटले. त्यानंतर आम्ही सर्वजण जमिनीवर झोपलो आणि दुरुन आवाज आला भूकंप.. भूकंप... भूकंप... आमची पाचावर धारण बसली. डोळ्याला धारा लागल्या. बाहेर देशात काय होणार याची चिंता सतावू लागली. जिकडे पाहावे तिकडे पडलेल्या इमारती आणि प्रेतांचे खच दिसत होते. अशाही परिस्थितीत आम्ही भारत गाठला. घरी सुखरुप आलो हा चमत्कारच म्हणावा लागेल, असे दारव्हा तालुक्यातील चाणी (कामठवाडा) येथील नेपाळ सहलीसाठी गेलेल्या तरुणांनी सांगितले. दारव्हा तालुक्यातील चाणी (कामठवाडा) आणि लिंगा येथील नऊ तरुण उत्तर भारतात देवदर्शनासाठी एका खासगी वाहनाने गेले होते. त्यात चाणी येथील संजय डवले, सुरज डवले, सुभाष उके, नथ्थू पारधी, दीपक अमोलकर, नामदेव ठोकळ, प्रफुल्ल डवले, नीलेश पुंड आणि लिंगा येथील उमेश लांडे यांचा समावेश होता. २५ एप्रिल रोजी मानसरोवर ट्रॅव्हल्सच्या मदतीने हे नऊ तरुण काठमांडूत पोहोचले. शनिवारी दुपारपर्यंतच पशुपतिनाथ मंदिर खुले राहते. त्यामुळे या नऊही जणांनी भारतीयप्रमाण वेळेनुसार ११.४१ वाजता (नेपाळच्या वेळेनुसार ११.५६ वाजता) मंदिरात पोहोचलो. मंदिर परिसरातील आठवणी कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न हे नऊ तरुण करीत होते. तोच जोरदार कडकडाट झाला. जमीन हलायला लागली. सारे लोक सैरावैरा धावत होते. हा प्रकार पाहून सर्वच्या सर्व मंदिराच्या समोर आम्ही जमिनीवर झोपलो. मंदिरही हलताना दिसत होते. डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. आपण या आपत्तीतून वाचणार की नाही याची चिंताही सतावत होती. तेथून कसेबसे बाहेर आलो आणि पाहतो तर काय इमारती जमीनदोस्त झालेल्या. लोक सैरावैरा पळत होते. त्याचवेळी पुन्हा दुसरा झटका बसला. आम्ही साखळी करून एकमेकांना घट्ट पकडून ठेवले. पायाखालची जमीनही हालत होती. मोकळ्या मैदानाकडे लोक धावत होते. भलामोठा लोखंडी खांब आमच्या समोर आडवा पडला. त्यावरून उडी मारुन आम्ही पुढे गेलो. इमारती जमीनदोस्त होत होत्या. धुळीने आसमंत व्यापून गेला होता. वाचवा.. वाचवा.. असेच शब्द कानावर येत होते. रस्त्यांना पडलेल्या भेगा आणि खचलेल्या इमारतीपाहून कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते. अशा परिस्थितीतही आणखी भूकंपाचे धक्के बसणार आहे, मोकळ्या मैदानात जा अशा सूचना कानावर ऐकायला येत होत्या. पशुपतिनाथ मंदिरातून आपल्या मानसरोवर ट्रॅव्हल्सकडे या नऊही जणांनी धाव घेतली. ही बस शोधायलाही बराच वेळ गेला. ज्या ठिकाणी बस उभी होतो तो भागही तिरपा झाला होता. अशा परिस्थितीत आपण आपल्या गावी पोहोचू की नाही अशीच भीती वाटत होती. घरच्यांना संदेश द्यायचा कसा असा प्रश्नही होता. सर्व मोबाईल आणि दूरध्वनी यंत्रणा ठप्प होती. एकमेकांना आधार देत कोणत्याही परिस्थितीत भारतात पोहोचायचेच असा निश्चय केला. कोठून ताकद आली हे मात्र सांगता येत नाही. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी असा दीडशे किलोमीटरचा घाट पार करीत आम्ही २७ एप्रिलला भारतात प्रवेश केला. सोनवली सीमा दिसताच जीवात जीव आला. नेपाळमध्ये प्रवेश करताना दिलेला मोबाईल क्रमांक कामी आला. भारतात प्रवेश करताच महाराष्ट्र सदनातून फोन आला. आपल्याला मदत हवी आहे का आपण कुठे आहात अशी विचारणा झाली. त्यावेळी आपण आता निश्चितच घरी पोहोचू असे वाटले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी घरी मोबाईलवरून संपर्क साधला. घरच्या मंडळींच्याही जीवात जीव आला. आयुष्यात कधीही न अनुभवलेला असा हा निसर्गाचा महाप्रलय या नऊ तरुणांनी आपल्या डोळ्यांनी साक्षात अनुभवला. २८ एप्रिलला ही मंडळी गावात पोहोचल्यावर अख्खे गावच त्यांच्या भेटीला आले. आजही हे तरुण भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला काठमांडूचे ते थरार सांगतात. मात्र चेहऱ्यावर भूकंपाची स्पष्ट दहशत दिसून येते. सात किमीसाठी मोजावे लागले दीड हजार भूकंपानंतर भारतात येण्याची या मंडळींची धडपड सुरू होती. काठमांडू शहरातून मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी सात किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. त्यासाठी दहा रुपये तिकीट आहे. परंतु भूकंपानंतर दीड हजार रुपये मोजून हे नऊही तरुण मुख्य रस्त्यावर पोहोचले. हॉटेलमध्ये पुन्हा गेलेच नाहीनेपाळमध्ये प्रवेश करताच या नऊही तरुणांनी काठमांडूच्या शिवशंकर हॉटेलमध्ये आपला मुक्काम ठोकला होता. पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन काठमांडू शहर पहाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पशुपतिनाथाच्या दारातच भूकंपाचा हादरा बसला. मात्र हॉटेलमध्ये साहित्य आणण्यासाठी हिंमतच झाली नाही. सर्व सामान सोडून ही मंडळी सरळ आपल्या बसकडे धावली.