शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

रस्तेच गेले खड्ड्यात, दयनीय अवस्था

By admin | Updated: December 4, 2014 23:17 IST

वणी विधानसभा क्षेत्रातील ‘रस्तेच गेले खड्ड्यात’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जड वाहतुकीमुळे बाधीत झालेल्या या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १0५ कोटी रूपयांची गरज असताना नाममात्र निधी

रवींद्र चांदेकर - वणी वणी विधानसभा क्षेत्रातील ‘रस्तेच गेले खड्ड्यात’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जड वाहतुकीमुळे बाधीत झालेल्या या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १0५ कोटी रूपयांची गरज असताना नाममात्र निधी उपलब्ध होऊन अद्याप ८0 कोटी रूपये मिळालेच नाही. परिणामी आता काही रस्ते प्रचंड दयनीय अवस्थेत आहेत.वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या २५ वर्षांत रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले. या रस्त्यांनी अनेक गावे शहर आणि तालुका ठिकाणाशी जोडली गेली आहेत. वणी, मारेगाव आणि झरी येथे तहसील आणि पंचायत समिती कार्यालय आहे. या गाव आणि शहरांशी नागरिकांचा दररोज संबध येतो. त्यासाठीच रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. आता वणी विधानसभा क्षेत्रात जवळपास १५३ किलोमीटर लांबीचे एकूण रस्ते आहेत. त्यातील जवळपास १२५ किलोमीटर लांबीचे रस्ते अवजड वाहतुकीमुळे बाधीत झाले आहेत. विधानसभा क्षेत्रात २२-२४ वर्षांपूर्वी हे रस्ते तयार करण्यात आले. २५ वर्षांपूर्वी या रस्त्यांवरून किरकोळ वाहतूक होत होती. आता गेल्या २0-२२ वर्षांत या विधानसभा क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. गेल्या २0-२२ वर्षांत परिसरात कोळसा, डोलोमाईट, चुनखडी आदी खनिजांच्या खाणी निर्माण झाल्या आहेत. एकट्या वेकोलिच्या १५ कोळसा खाणी आहेत. शिवाय गेल्या काही वर्षांत सिमेंट उद्योगानेही या परिसरात पाय रोवले आहेत. कोळसा डेपोही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आले आहेत. अनेक उद्योगांनी या परिसरात बस्तान मांडल्याने मोठ-मोठे ट्रक व इतर वाहनांची संख्या वाढली. कोळसा वाहून नेण्यासाठी तर चक्क १0-१२ चाकांची अनेक वाहने धावतात. मात्र ही सर्व वाहने २५ वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या जुन्याच रस्त्यांवरून धावत आहेत. हे जुने सर्व रस्ते वाढीव भार वाहण्यास सक्षम नव्हते. ते केवळ १0 टनांचा भार सोसू शकतात. तथापि प्रत्यक्षात त्यावरून तब्बल ५५ टनांच्या भार क्षमतेची वाहने धावत आहेत. त्यामुळे हे रस्तेच आता खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यात खड्डा आहे, की खड्ड्यात रस्ता, हे सांगणेही आता अवघड झाले आहे. या रस्त्यांवरून अवजड वाहतूक सुरू असल्याने जुने रस्ते आता दयनीय अवस्थेत पोहोचले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. त्यामुळे या सर्वच रस्त्यांची पुनर्बांधणी व त्यांचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळपास १0५ कोटींची निधी आवश्यक असल्याचे दीड वर्षांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र एवढा निधी आणायचा कोठून, हा गंभीर प्रश्न होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते मजबुतीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. त्यात या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल ११0 कोटींची गरज वर्तविण्यात आली होती.बांधकाम विभागाला दरवर्षी साधारणत: दोन कोटींच्या आसपास निधी रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त होतो. या तोकड्या निधीतून रस्ते दुरुस्ती शक्य नसल्याने दीड वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील वाहतूक कंपन्या व उद्योजकांची तत्कालीन आमदारांच्या उपस्थितीत यवतमाळात बैठक घेतली होती. त्या बैठकीत राज्य मार्गाच्या दुरूस्तीसाठी वाहतूक कंपन्या व उद्योजकांनी १९९ किलोमीटरच्या रस्ते दुरूस्तीसाठी ८0 कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तथापि त्यापैकी एक ‘छदाम’ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पांढरकवडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित कंपन्यांसोबत करारनामे करून रक्कम जमा करवून घ्यावयाची होती. त्यानंतर प्राकलन तयार करून रस्ते दुरूस्ती करावयाची होती. बांधकाम विभागाने करारनामे तयार करून संबंधित कंपन्यांकडे पाठविले होते. मात्र या कंपन्यांनी हे करारनामे चक्क बासनात गुंडाळून ठेवले. त्यावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार देत ते कचऱ्याच्या टोपलीत टाकले. त्यामुळे रस्ते पूर्ववत दयनीय अवस्थेत आहेत.