शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्हा परिषद निधीत काँग्रेसचेच वर्चस्व

By admin | Updated: May 9, 2014 01:17 IST

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असली तरी विकास निधीवर मात्र वर्चस्व काँग्रेसचेच आहे. जनसुविधेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीने ही बाब स्पष्ट केली आहे.

आमदारांना २२ कोटी : अध्यक्षांचे प्रस्ताव रखडलेयवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असली तरी विकास निधीवर मात्र वर्चस्व काँग्रेसचेच आहे. जनसुविधेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीने ही बाब स्पष्ट केली आहे. अध्यक्षांनी मर्जीतील सदस्यांना हा निधी देण्याचा मनसुबा रचला होता. काँग्रेसच्या आमदारांनी मात्र ऐनवेळी तो उधळून लावला. जिल्ह्यात दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समिती विरुद्ध जिल्हा परिषद असा निधीचा वाद सुरू आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या कामांच्या मंजुरीवरून हा वाद पेटला होता. तो अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला जनसुविधेच्या कामापोटी २२ कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीसाठी जिल्हा परिषदेने कामांचे प्रस्ताव पाठवायचे आणि नियोजन समितीने ते मंजूर करायचे अशी पद्धत आहे. जिल्हा परिषद ही या कामांसाठी नोडल एजंसी आहे. स्मशानभूमी विकास, दहनभूमी, दफन भूमी तेथील शेड, वॉल कंपाऊंड, पाण्याची सुविधा, रस्ता, विद्युत व्यवस्था आदी कामे जनसुविधेतून घेतली जातात. २२ कोटींचा निधी डोळ्यापुढे ठेऊन अध्यक्षांनी जिल्हा परिषद सदस्यांना कामांच्या याद्या मागितल्या. मात्र ते करताना पक्ष आणि सत्तेतील सर्मथक एवढेच उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवले गेले. काँग्रेस आमदारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शिवसेना, भाजपा व मनसेच्या जिल्हा परिषद सदस्यांना 'ताकद' दिली जात असल्याची बाब काँग्रेसच्या सदस्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरच अचानक चक्रे फिरली आणि या संपूर्ण २२ कोटींवर आमदारांनी कब्जा केला. त्यातही जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे असल्याने या निधीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. सातही आमदारांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी जनसुविधेच्या कामांसाठी दिला गेला. आमदारांनी आपल्या पद्धतीने कामे सूचविली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचासुद्धा एकही प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. हीच स्थिती त्यांनी प्रस्ताव मागितलेल्या मर्जीतील जिल्हा परिषद सदस्यांची झाली. पुसद व दिग्रस विधानसभा मतदारसंघातच अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. हीच स्थिती क वर्ग तीर्थ क्षेत्रातील सहा कोटींचे वाटप, ग्रामीण रस्त्यांचा विकास या १८ लाखांच्या निधीतही राहिली. तेथेही आमदारांचेच वर्चस्व राहिले. एकूणच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असूनही काँग्रेस आमदारांच्या वर्चस्वामुळे त्यांना फार काही करता आलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)