शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

जिल्हा परिषद निधीत काँग्रेसचेच वर्चस्व

By admin | Updated: May 9, 2014 01:17 IST

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असली तरी विकास निधीवर मात्र वर्चस्व काँग्रेसचेच आहे. जनसुविधेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीने ही बाब स्पष्ट केली आहे.

आमदारांना २२ कोटी : अध्यक्षांचे प्रस्ताव रखडलेयवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असली तरी विकास निधीवर मात्र वर्चस्व काँग्रेसचेच आहे. जनसुविधेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीने ही बाब स्पष्ट केली आहे. अध्यक्षांनी मर्जीतील सदस्यांना हा निधी देण्याचा मनसुबा रचला होता. काँग्रेसच्या आमदारांनी मात्र ऐनवेळी तो उधळून लावला. जिल्ह्यात दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समिती विरुद्ध जिल्हा परिषद असा निधीचा वाद सुरू आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या कामांच्या मंजुरीवरून हा वाद पेटला होता. तो अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. जिल्ह्याला जनसुविधेच्या कामापोटी २२ कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीसाठी जिल्हा परिषदेने कामांचे प्रस्ताव पाठवायचे आणि नियोजन समितीने ते मंजूर करायचे अशी पद्धत आहे. जिल्हा परिषद ही या कामांसाठी नोडल एजंसी आहे. स्मशानभूमी विकास, दहनभूमी, दफन भूमी तेथील शेड, वॉल कंपाऊंड, पाण्याची सुविधा, रस्ता, विद्युत व्यवस्था आदी कामे जनसुविधेतून घेतली जातात. २२ कोटींचा निधी डोळ्यापुढे ठेऊन अध्यक्षांनी जिल्हा परिषद सदस्यांना कामांच्या याद्या मागितल्या. मात्र ते करताना पक्ष आणि सत्तेतील सर्मथक एवढेच उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवले गेले. काँग्रेस आमदारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शिवसेना, भाजपा व मनसेच्या जिल्हा परिषद सदस्यांना 'ताकद' दिली जात असल्याची बाब काँग्रेसच्या सदस्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरच अचानक चक्रे फिरली आणि या संपूर्ण २२ कोटींवर आमदारांनी कब्जा केला. त्यातही जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे असल्याने या निधीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. सातही आमदारांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी जनसुविधेच्या कामांसाठी दिला गेला. आमदारांनी आपल्या पद्धतीने कामे सूचविली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचासुद्धा एकही प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. हीच स्थिती त्यांनी प्रस्ताव मागितलेल्या मर्जीतील जिल्हा परिषद सदस्यांची झाली. पुसद व दिग्रस विधानसभा मतदारसंघातच अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. हीच स्थिती क वर्ग तीर्थ क्षेत्रातील सहा कोटींचे वाटप, ग्रामीण रस्त्यांचा विकास या १८ लाखांच्या निधीतही राहिली. तेथेही आमदारांचेच वर्चस्व राहिले. एकूणच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता असूनही काँग्रेस आमदारांच्या वर्चस्वामुळे त्यांना फार काही करता आलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)