शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

उत्पन्नात घट येण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:11 IST

खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पाणीटंचाईची झळ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.यावर्षी अपुºया पावसामुळे पुसद उपविभागातील विहिरी, तलाव, नदी, नाले, धरणे कोरडीच आहे. तथापि, पिकांना अनुकूल पाऊस झाला आहे. मात्र सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे. कपाशीवर विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे पात्या गळत आहे. यामुळे यावर्षी उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. यातून त्यांना लागवड खर्च निघणेही कठीण जाणार आहे. त्यामुळे उपविभागातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहे.पुसद तालुक्यात भारी, मध्यम आणि मुरमाड अशा तीन प्रतीची जमीन आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा तोकडी असल्याने जवळपास ७० टक्के पिके निसर्गावर अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात होती. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमध्ये पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. या विश्रांतीमुळे उथळ जमिनीवरील पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिके आता पिवळी पडून माना टाकत आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. मात्र सोयाबीन व कपाशीवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा धरल्या आहे. कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातून शेतकºयांचा लागवड खर्च निघेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.अनेक शेतकºयांना यावर्षी थकबाकीदार असल्यामुळे कर्जही मिळाले नाही. त्यांनी उधारी व उसनवारी करून पेरणी केली. काहींनी खासगी सावकारांकडून पैशाची तजवीज केली. मात्र आता त्यांना हा खर्च निघेल की नाही, अशी शंका सतावत आहे. शेतकरी कुटुंबातील अनेक सदस्य मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी मोठ्या शहरात कामाला जाण्याच्या तयारीत आहे.भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाहीअपुºया पावसामुळे यावर्षी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडेच आहे. सोबतच माती नाला बांध, सिमेंट बंधारेही कोरडे आहे. लघु प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पूस धरण व इसापूर धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे भविष्यात शेती सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.