शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नात घट येण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:11 IST

खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पाणीटंचाईची झळ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.यावर्षी अपुºया पावसामुळे पुसद उपविभागातील विहिरी, तलाव, नदी, नाले, धरणे कोरडीच आहे. तथापि, पिकांना अनुकूल पाऊस झाला आहे. मात्र सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे. कपाशीवर विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे पात्या गळत आहे. यामुळे यावर्षी उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. यातून त्यांना लागवड खर्च निघणेही कठीण जाणार आहे. त्यामुळे उपविभागातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहे.पुसद तालुक्यात भारी, मध्यम आणि मुरमाड अशा तीन प्रतीची जमीन आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा तोकडी असल्याने जवळपास ७० टक्के पिके निसर्गावर अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात होती. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमध्ये पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. या विश्रांतीमुळे उथळ जमिनीवरील पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिके आता पिवळी पडून माना टाकत आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. मात्र सोयाबीन व कपाशीवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा धरल्या आहे. कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातून शेतकºयांचा लागवड खर्च निघेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.अनेक शेतकºयांना यावर्षी थकबाकीदार असल्यामुळे कर्जही मिळाले नाही. त्यांनी उधारी व उसनवारी करून पेरणी केली. काहींनी खासगी सावकारांकडून पैशाची तजवीज केली. मात्र आता त्यांना हा खर्च निघेल की नाही, अशी शंका सतावत आहे. शेतकरी कुटुंबातील अनेक सदस्य मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी मोठ्या शहरात कामाला जाण्याच्या तयारीत आहे.भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाहीअपुºया पावसामुळे यावर्षी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडेच आहे. सोबतच माती नाला बांध, सिमेंट बंधारेही कोरडे आहे. लघु प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पूस धरण व इसापूर धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे भविष्यात शेती सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.