शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

वर्ग दिले, शिक्षकच नाही

By admin | Updated: December 18, 2014 02:25 IST

शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये यावर्षी काही जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले़ मात्र या वर्गांना ...

वणी : शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये यावर्षी काही जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले़ मात्र या वर्गांना अतिरिक्त शिक्षक अजूनही देण्यात आले नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ पालकांनाही पश्चाताप होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे़शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्राथमिक स्तरावरील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत, तर आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना घरापासून तीन किलोमीटरच्या आत, शिक्षण उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे़ त्यामुळे यावर्षी या अधिनियमाचा अवलंब करून चार किलोमीटरपर्यंत शाळा असणाऱ्या काही शाळांमध्ये पाचवीचे वर्ग व सातवीपर्यंत शाळा असणाऱ्या काही जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.पालकांनी आपल्या गावातच शिक्षण उपलब्ध झाल्याने आपल्या पाल्यांना गावातीलच शाळेतच टाकले़ यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची पायपीट तर वाचली, परंतु त्यांना शिकवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाचवीच्या वर्ग उघडलेल्या शाळेत स्वतंत्र वर्गासाठी शिक्षक देणे गरजेचे असतानाही विद्यार्थी पटसंख्येअभावी शिक्षक देता आले नाही़ त्यामुळे जुन्याच कार्यरत शिक्षकांवर आणखी एका वर्गाचा बोजा पडला आहे. तसेच आठव्या वर्गाला इंग्रजी विषयाचे अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षकाची तसेच विज्ञान व गणित विषय शिकविण्यासाठी प्रशिक्षित विज्ञान पदवीधर शिक्षकाची नियुक्ती होणे आवश्यक होते़ मात्र तसेही झालेच नाहीे.बारावी, डी़एड़ झालेले शिक्षक आठव्या वर्गाला विज्ञान व गणित विषय शिकवू शकतच नाही़ त्यातच जिल्हा परिषदेकडे विज्ञान पदवीधर शिक्षकाची वाणवा आहे़ मग या वाढलेल्या आठव्या वर्गांना शिक्षक देणार कोठून? त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी, विज्ञान व गणिताची पाटी कोरीच राहण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्हा परिषद शाळेत विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत, तर मग विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिकणार कसे, हाही चिंतनीय प्रश्न निर्माण होत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)