शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

राज्यातील सर्वच पुलांची सुस्थिती तपासा - अपर मुख्य सचिवांचे आदेश

By admin | Updated: August 10, 2016 16:09 IST

महाड दुर्घटनेनंतरची सावधगिरी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी राज्यातील सर्वच मोठ्या नद्यांवरील

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि.10 - महाड दुर्घटनेनंतरची सावधगिरी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी राज्यातील सर्वच मोठ्या नद्यांवरील प्रमुख पुलांची सुस्थिती तपासण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. 

महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यात अनेकांचा बळी गेला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बांधकाम मुख्य अभियंत्यांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी रस्ते, पूल, इमारती आदींच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. महाड येथील दुर्घटनेसाठी पुलाची वेळीच दुरुस्ती न करणे, त्यात वाढलेली झाडे न काढणे, या झाडांमुळे खिळखिळा झालेला पुलाचा पाया, पुलाला पडलेल्या भेगा आदी कारणे पुढे आली. त्यामुळे आता राज्यातील सर्वच प्रकारच्या पुलांची सुस्थिती तपासा, आवश्यकता असेल तेथे दुरुस्ती करा, मोठी दुरुस्ती असेल तर त्याचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवा, अशा सूचना सिंग यांनी मुख्य अभियंत्यांना केल्या.  पूर्वी पूल व रस्त्यांच्या स्थितीबाबत मैलकुली अभियंत्यांना रिपोर्टिंग करायचे परंतु आता नव्या रचनेत हे पदच संपुष्टात आल्याने पुलांवर लक्ष देणार कोण असा मुद्दाही यावेळी पुढे आल्याचे सांगितले जाते. 
अमरावती विभागात ब्रिटीशकालीन तब्बल ४४ पूल असून त्यांच्या तासणीचे काम बांधकाम अभियंत्यांनी हाती घेतले आहे.
 
पूर हानीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचाही कार्यक्रम
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ते उखडले, ठिकठिकाणी खड्डे पडले. त्या पार्श्वभूमीवर पूर हानीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचाही कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या स्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला जाणार आहे. 
 
मागणीच्या तुलनेत तुटपूंजा निधी
पावसाळ्यात उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रत्येक महसूल विभागाचे बजेट सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींचे राहत असले तरी शासनाकडून प्रत्यक्षात त्यासाठी अवघा चार ते पाच कोटींचा निधी आणि तोही विलंबाने उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे एवढे मोठे खड्डे एवढ्या कमी पैशात बुजवायचे कसे असा प्रश्न निर्माण होतो. खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध नसतो, राजकीय नेत्यांकडून रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी होते. मग अशा वेळी अभियंते कंत्राटदारांकडून उधारीत रस्त्यांची डागडुजी करून घेतात.