शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यातील सर्वच पुलांची सुस्थिती तपासा - अपर मुख्य सचिवांचे आदेश

By admin | Updated: August 10, 2016 16:09 IST

महाड दुर्घटनेनंतरची सावधगिरी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी राज्यातील सर्वच मोठ्या नद्यांवरील

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि.10 - महाड दुर्घटनेनंतरची सावधगिरी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी राज्यातील सर्वच मोठ्या नद्यांवरील प्रमुख पुलांची सुस्थिती तपासण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. 

महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यात अनेकांचा बळी गेला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बांधकाम मुख्य अभियंत्यांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनी रस्ते, पूल, इमारती आदींच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. महाड येथील दुर्घटनेसाठी पुलाची वेळीच दुरुस्ती न करणे, त्यात वाढलेली झाडे न काढणे, या झाडांमुळे खिळखिळा झालेला पुलाचा पाया, पुलाला पडलेल्या भेगा आदी कारणे पुढे आली. त्यामुळे आता राज्यातील सर्वच प्रकारच्या पुलांची सुस्थिती तपासा, आवश्यकता असेल तेथे दुरुस्ती करा, मोठी दुरुस्ती असेल तर त्याचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवा, अशा सूचना सिंग यांनी मुख्य अभियंत्यांना केल्या.  पूर्वी पूल व रस्त्यांच्या स्थितीबाबत मैलकुली अभियंत्यांना रिपोर्टिंग करायचे परंतु आता नव्या रचनेत हे पदच संपुष्टात आल्याने पुलांवर लक्ष देणार कोण असा मुद्दाही यावेळी पुढे आल्याचे सांगितले जाते. 
अमरावती विभागात ब्रिटीशकालीन तब्बल ४४ पूल असून त्यांच्या तासणीचे काम बांधकाम अभियंत्यांनी हाती घेतले आहे.
 
पूर हानीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचाही कार्यक्रम
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ते उखडले, ठिकठिकाणी खड्डे पडले. त्या पार्श्वभूमीवर पूर हानीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचाही कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या स्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला जाणार आहे. 
 
मागणीच्या तुलनेत तुटपूंजा निधी
पावसाळ्यात उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रत्येक महसूल विभागाचे बजेट सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींचे राहत असले तरी शासनाकडून प्रत्यक्षात त्यासाठी अवघा चार ते पाच कोटींचा निधी आणि तोही विलंबाने उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे एवढे मोठे खड्डे एवढ्या कमी पैशात बुजवायचे कसे असा प्रश्न निर्माण होतो. खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध नसतो, राजकीय नेत्यांकडून रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी होते. मग अशा वेळी अभियंते कंत्राटदारांकडून उधारीत रस्त्यांची डागडुजी करून घेतात.