शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारावर

By admin | Updated: May 11, 2015 01:51 IST

मागील दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे़ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पोलीस ठाण्याचा

पांढरकवडा : मागील दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे़ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार अस्ताव्यस्त झाला असून कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी या पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे़तत्कालीन ठाणेदार अशोक बागुल यांची येथून बदली होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. बागुल यांची बदली झाल्यानंतर नेहमीप्रमाणे लगेच नवीन ठाणेदारांची या ठिकाणी नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती़ तथापि दीड महिन्यानंतरही या ठिकाणी नवीन ठाणेदारांची अद्याप नियुक्ती झाली नाही़ तेव्हापासून येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे़ गृह खात्याने अद्यापही नवीन ठाणेदाराची नियुक्ती केली नाही़ परिणामी पोलीस ठाण्याचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ शहर तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे़ गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ अवैध व्यावसायीकांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही़ जागोजागी मटका, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी, पाटणबोरीपासून तर करंजीपर्यंत अवैध व्यवसायांना अक्षरश: उधाण आले आहे़ पोलिसांच्या नाकावर टिच्चून गावागावात अवैध व्यावसायीकांनी आपापले अड्डे सुरु केले आहे़ त्यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत़करंजी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र येऊन त्यांनी हे अवेध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली़ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला़ परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही़ या अड्ड्यांवर धाडी मारण्याचे केवळ नाटक केले जाते, असा सुज्ञ नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे़ धाड मारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे अड्डे पूर्ववत सुरु होतातच कसे, हा संशोधनाचा विषय आहे़वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही याकडे सतत दुर्लक्ष होत आहे़ अवैध व्यासायीकांवर कुणाचाच वचक नसल्यामुळे अवैध धंद्यांमध्ये सतत वाढ होत आहे़ शहराच्या चोरमंडी परिसरात, मेन लाईनमध्ये, ओम टॉकीज परिसर व ठाण्याच्या जवळच बसस्थानक परिसरात खुलेआमपणे जुगार, मटका, ताजी वरली आदी व्यवसाय सुरू आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तालुक्यात येते, या अड्ड्यांवर धाड मारते, लाखो रूपयांचा जुगार हजारात दाखविते, अन् हे पथक गेल्यानंतर पुन्हा अड्डे सुरू होतात़ हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे़ त्यामुळे या अड्ड्याव्ांर केवळ धाड मारल्याचे नाटक केले जाते, असा नागरिकांचा समज झाला आहे. तो दूर करण्याची जबबादारी पोलिसांवरच आली आहे. (तालुका प्रतिनिधी)