शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारावर

By admin | Updated: May 11, 2015 01:51 IST

मागील दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे़ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पोलीस ठाण्याचा

पांढरकवडा : मागील दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे़ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार अस्ताव्यस्त झाला असून कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी या पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे़तत्कालीन ठाणेदार अशोक बागुल यांची येथून बदली होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. बागुल यांची बदली झाल्यानंतर नेहमीप्रमाणे लगेच नवीन ठाणेदारांची या ठिकाणी नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती़ तथापि दीड महिन्यानंतरही या ठिकाणी नवीन ठाणेदारांची अद्याप नियुक्ती झाली नाही़ तेव्हापासून येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे़ गृह खात्याने अद्यापही नवीन ठाणेदाराची नियुक्ती केली नाही़ परिणामी पोलीस ठाण्याचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ शहर तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे़ गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ अवैध व्यावसायीकांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही़ जागोजागी मटका, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी, पाटणबोरीपासून तर करंजीपर्यंत अवैध व्यवसायांना अक्षरश: उधाण आले आहे़ पोलिसांच्या नाकावर टिच्चून गावागावात अवैध व्यावसायीकांनी आपापले अड्डे सुरु केले आहे़ त्यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत़करंजी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र येऊन त्यांनी हे अवेध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली़ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला़ परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही़ या अड्ड्यांवर धाडी मारण्याचे केवळ नाटक केले जाते, असा सुज्ञ नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे़ धाड मारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे अड्डे पूर्ववत सुरु होतातच कसे, हा संशोधनाचा विषय आहे़वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही याकडे सतत दुर्लक्ष होत आहे़ अवैध व्यासायीकांवर कुणाचाच वचक नसल्यामुळे अवैध धंद्यांमध्ये सतत वाढ होत आहे़ शहराच्या चोरमंडी परिसरात, मेन लाईनमध्ये, ओम टॉकीज परिसर व ठाण्याच्या जवळच बसस्थानक परिसरात खुलेआमपणे जुगार, मटका, ताजी वरली आदी व्यवसाय सुरू आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तालुक्यात येते, या अड्ड्यांवर धाड मारते, लाखो रूपयांचा जुगार हजारात दाखविते, अन् हे पथक गेल्यानंतर पुन्हा अड्डे सुरू होतात़ हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे़ त्यामुळे या अड्ड्याव्ांर केवळ धाड मारल्याचे नाटक केले जाते, असा नागरिकांचा समज झाला आहे. तो दूर करण्याची जबबादारी पोलिसांवरच आली आहे. (तालुका प्रतिनिधी)