शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम

By admin | Updated: May 10, 2014 02:30 IST

जिल्हा पषिदेतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे. एप्रिल २०१३ मध्ये ग्रामविकास विभागाने दिलेल्या ....

यवतमाळ : जिल्हा पषिदेतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे. एप्रिल २०१३ मध्ये ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे अधिकार्‍यांसोबतच पदाधिकार्‍यांच्याही हालचाली वाढल्याचे दिसत आहे. अनेकांसाठी हा सुगीचा काळ असतो. प्रत्येक जण आपआपल्यापरीने ही प्रक्रिया ‘कॅश’ करण्यासाठी धडपडतो. पंचायत विभाग, सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, पाणी पूरवठा विभाग, कृषी, आरोग्य, महिला बालकल्याण विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यासाठी सर्व विभागाने बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे. सामान्य प्रशासन आणि पंचायत विभागातील बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. याप्रमाणेच इतरही विभाग बदलीस पात्र कर्मचार्‍यांची आक्षेपासाठी यादी जाहीर करणार आहे. ९ ते १५ मे दरम्यान आक्षेप घेता येणार आहे. या आक्षेपावर १५ मे रोजी सुनावणी करून अंतिम यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर १७ ते २३ मे दरम्यान समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष स्क्रिनवर रिक्त जागा पाहुन कर्मचार्‍यांना बदली आदेश देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यसाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या प्रक्रियेत शक्यतो तक्रार कर्त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कर्मचार्‍यांच्या अडचणी येथे निकाली काढून प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यावर भर दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांनी कोणत्याही भुलथापाना बळी पडू नये, असे आवहनही करण्यात आले आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता बदलीच्या हंगामात होणार घोडेबाजार थांबविण्याचे आव्हान राहणार आहे. जिल्हास्तरावरच्या बदल्या झाल्यानंतर लगेच २६ ते ३१ मे दरम्यान पंचायत समितीस्तरावरची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीस्तरावरून पात्र कर्मचार्‍यांची यादी प्रसिध्द करून आक्षेपाच्या सुनावणी नंतर समुपदेशनानेच बदली करणार आहेत. बदल्याच्या हंगमामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक कर्मचारी धास्तावलेले आहेत. तर काहींनी सोयीचे ठिकाण मिळविण्याची संधी आल्याने ‘सेटींग’ लावणे सुरू केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)