शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शेतकऱ्यांपुढे गाजर गवत निर्मूलनाचे आव्हान

By admin | Updated: May 8, 2015 23:52 IST

शेतीवर असलेली संकटांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही.

मशागतीचा तिढा : तणनाशकही ठरले फेल यवतमाळ : शेतीवर असलेली संकटांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. यावर्षी अनियमित हवामानामुळे सातत्याने पाऊस झाला. परिणामी मे महिन्यातही शेत हिरवेकंच दिसत आहे. पीक काढून रिकामे झालेल्या शेतात सर्वत्र गाजर गवत वाढले आहे. या गांजर गवताचे निर्मूलन करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गाजर गवत हे पाच ते दहा वर्षांपूर्वी शहरातील मोकळ््या जागेत दिसत होते. पाहता पाहता त्याने शेताचा धुरा गाठला. आता तर संपूर्ण शेतच गाजर गवताच्या विळख्यात आले आहे. हे गवत जनावरांना खाण्यायोग्य नाही, त्यामुळे जनावरे त्याकडे पाहत नाही. शिवाय अनेक व्यक्तींना गाजर गवतापासून अ‍ॅलर्जीसुद्धा होते असा विषारी अंश असलेले गाजर गवत निर्मूल कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गाजर गवताचे बी अतिशय बारिक असून, फुलातील पाकळ््यांसोबत ते सर्वत्र उडते. हवेच्या झुळकीसोबत कित्येक किलोमीटर गाजर गवताचे बी वाहून जाते. आता तर गाजर गवतामुळे उपजाऊ जमिनीलाही पडिक जमिनीचे स्वरुप आले आहे. या गांजर गवतच्या निर्मूलनासाठी सुरूवातीला तणनाशकाचा प्रयोग शेतकरी करत होते.मात्र तणनाशक औषधांचाही फारसा प्रभाव गांजर गवतावर होत नाही. काही दिवस वाढ खुंटल्यानंतर पुन्हा जोमाने गांजर गवताचे झाड वाढू लागते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतात पिकातील आंतर मशागत बंद करण्यात आली, त्याचा परिणाम गांजर गवताच्या वाढीवर झाला आहे. आता या गवतामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. धुऱ्याच्या बांधावर अनेक मोकळ््या जागेतही गाजर गवतच उगवत असल्याने इतर गवतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गवत बारमाही हिरवे राहणारे असून, त्याला वर्षातील कोणत्याही ऋतुत फुल येते. जितकी फुले तितकेच गांजर गवताचे बी असे चक्रच निर्माण झाले आहे. याच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय शेतकऱ्यांकडे नाही. (कार्यालय प्रतिनिधी)कोरडवाहूतही विळखा सिंचनाच्या शेतात गाजर गवत दिसत होते. यावर्षी मात्र कोरडवाहू असलेल्या शेतानांही विळखा बसला आहे. सततच्या पावसामुळे त्याची वाढ जोमाने होत आहे. 1गांजर गवत निर्मूलनासाठी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या शेतात जरी गांजर गवत राहिल्यास निर्मूलनाचा कोणताच फायदा होत नाही. पुन्हा सर्वत्र लवकरच गांजर गवत उगविण्यास सुरूवात होते.2गांजर गवताचे बी हलके व हवेने सहज उडणारे आहे. त्यामुळे लगतच्या पाच-दहा किलोमीटरच्या परिसरात त्याचे बी पसरते. कोणत्याही तापमानात उगविण्याची शक्ती असल्याने सहज वाढ होते. 3निंदण आणि डवरणीच्या पाळ््या देणे जवळपास बंद झाले आहे. बहुतांश शेतकरी सोयाबीनमध्ये तणनाशकांचा वापर करतात. याचा विपरित परिणाम गांजर गवताच्या रुपाने दिसत आहे. मात्र हंगामात शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज ठरतो. शिवाय ही बाब आता खर्चीक झाली आहे.