शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शेतकऱ्यांपुढे गाजर गवत निर्मूलनाचे आव्हान

By admin | Updated: May 8, 2015 23:52 IST

शेतीवर असलेली संकटांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही.

मशागतीचा तिढा : तणनाशकही ठरले फेल यवतमाळ : शेतीवर असलेली संकटांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. यावर्षी अनियमित हवामानामुळे सातत्याने पाऊस झाला. परिणामी मे महिन्यातही शेत हिरवेकंच दिसत आहे. पीक काढून रिकामे झालेल्या शेतात सर्वत्र गाजर गवत वाढले आहे. या गांजर गवताचे निर्मूलन करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गाजर गवत हे पाच ते दहा वर्षांपूर्वी शहरातील मोकळ््या जागेत दिसत होते. पाहता पाहता त्याने शेताचा धुरा गाठला. आता तर संपूर्ण शेतच गाजर गवताच्या विळख्यात आले आहे. हे गवत जनावरांना खाण्यायोग्य नाही, त्यामुळे जनावरे त्याकडे पाहत नाही. शिवाय अनेक व्यक्तींना गाजर गवतापासून अ‍ॅलर्जीसुद्धा होते असा विषारी अंश असलेले गाजर गवत निर्मूल कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गाजर गवताचे बी अतिशय बारिक असून, फुलातील पाकळ््यांसोबत ते सर्वत्र उडते. हवेच्या झुळकीसोबत कित्येक किलोमीटर गाजर गवताचे बी वाहून जाते. आता तर गाजर गवतामुळे उपजाऊ जमिनीलाही पडिक जमिनीचे स्वरुप आले आहे. या गांजर गवतच्या निर्मूलनासाठी सुरूवातीला तणनाशकाचा प्रयोग शेतकरी करत होते.मात्र तणनाशक औषधांचाही फारसा प्रभाव गांजर गवतावर होत नाही. काही दिवस वाढ खुंटल्यानंतर पुन्हा जोमाने गांजर गवताचे झाड वाढू लागते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतात पिकातील आंतर मशागत बंद करण्यात आली, त्याचा परिणाम गांजर गवताच्या वाढीवर झाला आहे. आता या गवतामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. धुऱ्याच्या बांधावर अनेक मोकळ््या जागेतही गाजर गवतच उगवत असल्याने इतर गवतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गवत बारमाही हिरवे राहणारे असून, त्याला वर्षातील कोणत्याही ऋतुत फुल येते. जितकी फुले तितकेच गांजर गवताचे बी असे चक्रच निर्माण झाले आहे. याच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय शेतकऱ्यांकडे नाही. (कार्यालय प्रतिनिधी)कोरडवाहूतही विळखा सिंचनाच्या शेतात गाजर गवत दिसत होते. यावर्षी मात्र कोरडवाहू असलेल्या शेतानांही विळखा बसला आहे. सततच्या पावसामुळे त्याची वाढ जोमाने होत आहे. 1गांजर गवत निर्मूलनासाठी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या शेतात जरी गांजर गवत राहिल्यास निर्मूलनाचा कोणताच फायदा होत नाही. पुन्हा सर्वत्र लवकरच गांजर गवत उगविण्यास सुरूवात होते.2गांजर गवताचे बी हलके व हवेने सहज उडणारे आहे. त्यामुळे लगतच्या पाच-दहा किलोमीटरच्या परिसरात त्याचे बी पसरते. कोणत्याही तापमानात उगविण्याची शक्ती असल्याने सहज वाढ होते. 3निंदण आणि डवरणीच्या पाळ््या देणे जवळपास बंद झाले आहे. बहुतांश शेतकरी सोयाबीनमध्ये तणनाशकांचा वापर करतात. याचा विपरित परिणाम गांजर गवताच्या रुपाने दिसत आहे. मात्र हंगामात शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज ठरतो. शिवाय ही बाब आता खर्चीक झाली आहे.