शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

व्यवस्था विषमतेने पोखरलेली अरुंधती

By admin | Updated: May 12, 2014 00:15 IST

जाती व्यवस्थेला दैवी मान्यता असल्याचा समज जनमाणसात पसरवून विषमता जोपासली जात आहे. आपण अत्यंत घृणा वाटावी अशा विषमतेने पोखरलेल्या एका समाज व्यवस्थेत जीवन जगत आहो,

रॉय : समता पर्व २०१४ चे उद्घाटन ं

यवतमाळ : जाती व्यवस्थेला दैवी मान्यता असल्याचा समज जनमाणसात पसरवून विषमता जोपासली जात आहे. आपण अत्यंत घृणा वाटावी अशा विषमतेने पोखरलेल्या एका समाज व्यवस्थेत जीवन जगत आहो, असे प्रतिपादन जगविख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी केले. त्या समता पर्व २०१४ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. समता मैदानावर आयोजित समता पर्व २०१४ चे उद्घाटन अरुंधती रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. जाती व्यवस्थेच्या माध्यमातून विषमता कशी जोपासली जात आहे, यावर अरुंधती रॉय यांनी प्रकाश टाकला. देशातील ८०० मिलीयन लोकसंख्या केवळ २० रुपयापेक्षा कमी पैशात आपली गुजराण करीत आहे. याच वर्गाला कारखाने, प्रकल्प यासाठी वारंवार विस्थापित केले जात आहे. केवळ तीन टक्के असलेल्या वर्गाकडून ही व्यवस्था जोपासली जात आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी यांना आपसात भांडत ठेवले जात आहे. गुजरातच्या दंगलीत हिंदूच्या नावाखाली दलित व ओबीसींना आरोपी बनविण्यात आले. निवडणुकीच्या काळात अतिशय चुकीच्या पध्दतीने प्रचार केला जात आहे. आज माध्यम आणि अर्थव्यवस्था भांडवलदाराच्या हातात एकवटली आहे. त्याच पध्दतीने राजकीय पुढारीसुध्दा सोयीची भूमिका घेत आहे. पूर्वी आदिवासींच्या हक्कासाठी सुरू असलेल्या चळवळींना आता बदनाम करण्यात आले आहे. देशातील बहुतांश राज्यात सैनिक तैनात करावे लागत आहे. दलितांवरच्या अन्यायाबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा संदर्भ देत त्याची भीषणता त्यांनी विशद केली. गुजरातच्या विकासाची बोंब केली जात आहे. तेथेच सर्वाधिक जातीयवाद आणि विषमता असल्याचे रॉय यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्वेषांच्या विभाजनवादी परियोजनांना मोडीत काढण्यासाठी आमच्या राजकारणाने योजना तयार केल्या पाहिजेत. हिंसक शक्तीला बळी पडून ज्यांची छळवणूक झाली, त्यांना मदत केली पाहीजे. न्यायाचे तत्व केंद्रस्थानी असेल, अशी राजकीय दृष्टी आम्ही विकसित केली पाहिजे, असे आवाहन करतांनाच हा न्याय मुठभर लोकांसाठी नसावा, अशी सूचनाही अरुंधती रॉय यांनी केली. त्यांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद प्रा. माधव सरकुंडे यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदीप कांबळे होते. यावेळी एस. आनंद, डॉ. मनिषा बांगर, डॉ. कांचा इलय्या यांनी मार्गदर्शन केले. मंचावर महाकवी सुधाकर गायधनी, सुनील सरदार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)