शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

व्यवस्था विषमतेने पोखरलेली अरुंधती

By admin | Updated: May 12, 2014 00:15 IST

जाती व्यवस्थेला दैवी मान्यता असल्याचा समज जनमाणसात पसरवून विषमता जोपासली जात आहे. आपण अत्यंत घृणा वाटावी अशा विषमतेने पोखरलेल्या एका समाज व्यवस्थेत जीवन जगत आहो,

रॉय : समता पर्व २०१४ चे उद्घाटन ं

यवतमाळ : जाती व्यवस्थेला दैवी मान्यता असल्याचा समज जनमाणसात पसरवून विषमता जोपासली जात आहे. आपण अत्यंत घृणा वाटावी अशा विषमतेने पोखरलेल्या एका समाज व्यवस्थेत जीवन जगत आहो, असे प्रतिपादन जगविख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी केले. त्या समता पर्व २०१४ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. समता मैदानावर आयोजित समता पर्व २०१४ चे उद्घाटन अरुंधती रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. जाती व्यवस्थेच्या माध्यमातून विषमता कशी जोपासली जात आहे, यावर अरुंधती रॉय यांनी प्रकाश टाकला. देशातील ८०० मिलीयन लोकसंख्या केवळ २० रुपयापेक्षा कमी पैशात आपली गुजराण करीत आहे. याच वर्गाला कारखाने, प्रकल्प यासाठी वारंवार विस्थापित केले जात आहे. केवळ तीन टक्के असलेल्या वर्गाकडून ही व्यवस्था जोपासली जात आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी यांना आपसात भांडत ठेवले जात आहे. गुजरातच्या दंगलीत हिंदूच्या नावाखाली दलित व ओबीसींना आरोपी बनविण्यात आले. निवडणुकीच्या काळात अतिशय चुकीच्या पध्दतीने प्रचार केला जात आहे. आज माध्यम आणि अर्थव्यवस्था भांडवलदाराच्या हातात एकवटली आहे. त्याच पध्दतीने राजकीय पुढारीसुध्दा सोयीची भूमिका घेत आहे. पूर्वी आदिवासींच्या हक्कासाठी सुरू असलेल्या चळवळींना आता बदनाम करण्यात आले आहे. देशातील बहुतांश राज्यात सैनिक तैनात करावे लागत आहे. दलितांवरच्या अन्यायाबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा संदर्भ देत त्याची भीषणता त्यांनी विशद केली. गुजरातच्या विकासाची बोंब केली जात आहे. तेथेच सर्वाधिक जातीयवाद आणि विषमता असल्याचे रॉय यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्वेषांच्या विभाजनवादी परियोजनांना मोडीत काढण्यासाठी आमच्या राजकारणाने योजना तयार केल्या पाहिजेत. हिंसक शक्तीला बळी पडून ज्यांची छळवणूक झाली, त्यांना मदत केली पाहीजे. न्यायाचे तत्व केंद्रस्थानी असेल, अशी राजकीय दृष्टी आम्ही विकसित केली पाहिजे, असे आवाहन करतांनाच हा न्याय मुठभर लोकांसाठी नसावा, अशी सूचनाही अरुंधती रॉय यांनी केली. त्यांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद प्रा. माधव सरकुंडे यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदीप कांबळे होते. यावेळी एस. आनंद, डॉ. मनिषा बांगर, डॉ. कांचा इलय्या यांनी मार्गदर्शन केले. मंचावर महाकवी सुधाकर गायधनी, सुनील सरदार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)