शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

हिरव्या स्वप्नावर नांगर

By admin | Updated: November 2, 2015 01:52 IST

दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे.

सोयाबीन सोंगलेच नाही : बोरी परिसरात शेतकऱ्यांचे नुकसानबोरीअरब : दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. परिसरातील १५ हून अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्याचे कामच पडले नाही. नापिकी पाहून या शेतकऱ्यांनी हिरव्यागार उभ्या पिकात नांगर फिरविला. मनस्ताप सहन करणाऱ्या या कष्टकऱ्यांना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. यावर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही पावसाने दगा दिला. अपार मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन कसेबसे जगवले. मात्र वाढलेल्या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाही. थोड्याथोडक्या शेंगा लागल्या तर त्यात दाणेच भरले नाही. हलक्या जमिनीतील सोयाबीन शेंगा पकडण्याआधीच वाळून गेले. सोयाबीन हिरवेकंच होते. पण वेळेवर पाऊस न आल्यामुळे शेंगा भरू शकल्या नाही. असे सोयाबीन सोंगण्याचा खर्च तरी कशाला करायचा, हा विचार करून शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर नांगर फिरविला.पैसेवारीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे कृषी विभागाने दाखविले. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना एकरी एक किंवा दोन पोते उत्पादन झाले. यात हलक्या जमिनीत तर किलोप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन आले. सोंगायचे पैसे निघाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणेही टाळले. उभ्या पिकात नांगरणी केली. ही परिस्थिती एकट्या बोरीअरब परिसरातीलच नाही, तर अनेक भागात दिसून येत आहे. यातील गजानन बोरकर, अनंता बोरकर, स्वप्नील पडगिलवार, राजू तांगडे, ओमप्रकाश लढ्ढा, अशोक पवने, बंडू कचरे, तीर्थेश्वर राऊत, सुधाकर चारोळे, विलास गिरी, भागिरथा गवई, मधूकर वीर, अविनाश तिवारी, शंकर महल्ले, कौसल्या इंगोले या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन नांगरून टाकले आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली. खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. पाण्याने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीन निघाले नाही. यामुळे दुबार पेरणी करायचे काम पडले. यात सोयाबीन कसेबसे निघाले. नंतर अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीन वाळले. उर्वरित सोयाबीनला फुलोर यावा म्हणून महागड्या औषधांची फवारणी केली. तरीही फायदा झाला नाही. कशाबशा लागलेल्या शेंगाही पावसाअभावी भरू शकल्या नाही. शेवटी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रबी पीक घेण्यासाठी उभे सोयाबीन नांगरले आहे. हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने परिसरातील विहिरींची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे रबीतील पिकांची पेरणीही कमी प्रमाणात होत आहे. खरीप हंगामात सोयाबीनला पाणी देण्यासाठी विहिरी होत्या. पण पुरेसे पाणी नव्हते. जिथे पुरेसे पाणी होते, तिथे वीज पुरवठा सुरळीत नव्हता. एकीकडे शासन पैसेवारीमध्ये पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवते. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उभ्या पिकात नांगर फिरवावा लागत आहे. (वार्ताहर)आधी पेरलं, तर पाण्याने चाट दिली. दुसऱ्यांदा पेरलेलं कसंबसं उगवलं, तर पुन्हा पावसाने दडी मारली. सोयाबीन हिरवे दिसत होते. पण शेंगाच भरल्या नाही. असे सोयाबीन सोंगून कुटारालाही महाग होते. म्हणून उभ्या पिकात नांगर फिरवला. सरकार वाळल्यासोबत ओलही जाळते. सरकारची मदत भेटतेच कुठे?- गजानन बोरकरशेतकरी, बोरीअरब