शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या स्वप्नावर नांगर

By admin | Updated: November 2, 2015 01:52 IST

दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे.

सोयाबीन सोंगलेच नाही : बोरी परिसरात शेतकऱ्यांचे नुकसानबोरीअरब : दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. परिसरातील १५ हून अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्याचे कामच पडले नाही. नापिकी पाहून या शेतकऱ्यांनी हिरव्यागार उभ्या पिकात नांगर फिरविला. मनस्ताप सहन करणाऱ्या या कष्टकऱ्यांना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. यावर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही पावसाने दगा दिला. अपार मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन कसेबसे जगवले. मात्र वाढलेल्या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाही. थोड्याथोडक्या शेंगा लागल्या तर त्यात दाणेच भरले नाही. हलक्या जमिनीतील सोयाबीन शेंगा पकडण्याआधीच वाळून गेले. सोयाबीन हिरवेकंच होते. पण वेळेवर पाऊस न आल्यामुळे शेंगा भरू शकल्या नाही. असे सोयाबीन सोंगण्याचा खर्च तरी कशाला करायचा, हा विचार करून शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर नांगर फिरविला.पैसेवारीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे कृषी विभागाने दाखविले. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना एकरी एक किंवा दोन पोते उत्पादन झाले. यात हलक्या जमिनीत तर किलोप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन आले. सोंगायचे पैसे निघाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणेही टाळले. उभ्या पिकात नांगरणी केली. ही परिस्थिती एकट्या बोरीअरब परिसरातीलच नाही, तर अनेक भागात दिसून येत आहे. यातील गजानन बोरकर, अनंता बोरकर, स्वप्नील पडगिलवार, राजू तांगडे, ओमप्रकाश लढ्ढा, अशोक पवने, बंडू कचरे, तीर्थेश्वर राऊत, सुधाकर चारोळे, विलास गिरी, भागिरथा गवई, मधूकर वीर, अविनाश तिवारी, शंकर महल्ले, कौसल्या इंगोले या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन नांगरून टाकले आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली. खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. पाण्याने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीन निघाले नाही. यामुळे दुबार पेरणी करायचे काम पडले. यात सोयाबीन कसेबसे निघाले. नंतर अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीन वाळले. उर्वरित सोयाबीनला फुलोर यावा म्हणून महागड्या औषधांची फवारणी केली. तरीही फायदा झाला नाही. कशाबशा लागलेल्या शेंगाही पावसाअभावी भरू शकल्या नाही. शेवटी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रबी पीक घेण्यासाठी उभे सोयाबीन नांगरले आहे. हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने परिसरातील विहिरींची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे रबीतील पिकांची पेरणीही कमी प्रमाणात होत आहे. खरीप हंगामात सोयाबीनला पाणी देण्यासाठी विहिरी होत्या. पण पुरेसे पाणी नव्हते. जिथे पुरेसे पाणी होते, तिथे वीज पुरवठा सुरळीत नव्हता. एकीकडे शासन पैसेवारीमध्ये पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवते. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उभ्या पिकात नांगर फिरवावा लागत आहे. (वार्ताहर)आधी पेरलं, तर पाण्याने चाट दिली. दुसऱ्यांदा पेरलेलं कसंबसं उगवलं, तर पुन्हा पावसाने दडी मारली. सोयाबीन हिरवे दिसत होते. पण शेंगाच भरल्या नाही. असे सोयाबीन सोंगून कुटारालाही महाग होते. म्हणून उभ्या पिकात नांगर फिरवला. सरकार वाळल्यासोबत ओलही जाळते. सरकारची मदत भेटतेच कुठे?- गजानन बोरकरशेतकरी, बोरीअरब