शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हिरव्या स्वप्नावर नांगर

By admin | Updated: November 2, 2015 01:52 IST

दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे.

सोयाबीन सोंगलेच नाही : बोरी परिसरात शेतकऱ्यांचे नुकसानबोरीअरब : दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. परिसरातील १५ हून अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्याचे कामच पडले नाही. नापिकी पाहून या शेतकऱ्यांनी हिरव्यागार उभ्या पिकात नांगर फिरविला. मनस्ताप सहन करणाऱ्या या कष्टकऱ्यांना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. यावर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही पावसाने दगा दिला. अपार मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन कसेबसे जगवले. मात्र वाढलेल्या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाही. थोड्याथोडक्या शेंगा लागल्या तर त्यात दाणेच भरले नाही. हलक्या जमिनीतील सोयाबीन शेंगा पकडण्याआधीच वाळून गेले. सोयाबीन हिरवेकंच होते. पण वेळेवर पाऊस न आल्यामुळे शेंगा भरू शकल्या नाही. असे सोयाबीन सोंगण्याचा खर्च तरी कशाला करायचा, हा विचार करून शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर नांगर फिरविला.पैसेवारीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे कृषी विभागाने दाखविले. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना एकरी एक किंवा दोन पोते उत्पादन झाले. यात हलक्या जमिनीत तर किलोप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन आले. सोंगायचे पैसे निघाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणेही टाळले. उभ्या पिकात नांगरणी केली. ही परिस्थिती एकट्या बोरीअरब परिसरातीलच नाही, तर अनेक भागात दिसून येत आहे. यातील गजानन बोरकर, अनंता बोरकर, स्वप्नील पडगिलवार, राजू तांगडे, ओमप्रकाश लढ्ढा, अशोक पवने, बंडू कचरे, तीर्थेश्वर राऊत, सुधाकर चारोळे, विलास गिरी, भागिरथा गवई, मधूकर वीर, अविनाश तिवारी, शंकर महल्ले, कौसल्या इंगोले या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन नांगरून टाकले आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली. खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. पाण्याने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीन निघाले नाही. यामुळे दुबार पेरणी करायचे काम पडले. यात सोयाबीन कसेबसे निघाले. नंतर अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीन वाळले. उर्वरित सोयाबीनला फुलोर यावा म्हणून महागड्या औषधांची फवारणी केली. तरीही फायदा झाला नाही. कशाबशा लागलेल्या शेंगाही पावसाअभावी भरू शकल्या नाही. शेवटी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रबी पीक घेण्यासाठी उभे सोयाबीन नांगरले आहे. हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने परिसरातील विहिरींची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे रबीतील पिकांची पेरणीही कमी प्रमाणात होत आहे. खरीप हंगामात सोयाबीनला पाणी देण्यासाठी विहिरी होत्या. पण पुरेसे पाणी नव्हते. जिथे पुरेसे पाणी होते, तिथे वीज पुरवठा सुरळीत नव्हता. एकीकडे शासन पैसेवारीमध्ये पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवते. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उभ्या पिकात नांगर फिरवावा लागत आहे. (वार्ताहर)आधी पेरलं, तर पाण्याने चाट दिली. दुसऱ्यांदा पेरलेलं कसंबसं उगवलं, तर पुन्हा पावसाने दडी मारली. सोयाबीन हिरवे दिसत होते. पण शेंगाच भरल्या नाही. असे सोयाबीन सोंगून कुटारालाही महाग होते. म्हणून उभ्या पिकात नांगर फिरवला. सरकार वाळल्यासोबत ओलही जाळते. सरकारची मदत भेटतेच कुठे?- गजानन बोरकरशेतकरी, बोरीअरब