शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

खरिपाच्या तोंडावर अवैध सावकार सक्रिय

By admin | Updated: May 21, 2015 00:10 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून खते आणि बियाण्यासांठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे.

दामदुप्पट व्याज : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाहीउमरखेड : खरीप हंगाम तोंडावर आला असून खते आणि बियाण्यासांठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. या वर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकऱ्यांजवळ पुरेस पैसे नसल्याने त्यांना पैशासाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तालुक्यातील बंदी भागात आंध्र प्रदेशासह गावातील सावकार सक्रिय झाले आहेत. उमरखेड तालुक्याच्या पैनगंगा अभयारण्य परिसरात अनेक गावे आहेत. दऱ्याखोऱ्यात वसलेल्या या परिसरातील नागरिकांचा शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. अलीकडच्या काळात वनविभागाच्या जाचक अटीमुळे पशुपालन कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा अपुऱ्या पावसाने खरीप उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांच्या हातात फुटकी कवडी आली नाही. आगामी खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी पैसे नसल्याने सावकाराकडे धाव घ्यावी लागत आहे. बंदी भागातील अनेक गावात सावकार आणि त्यांचे दलाल सक्रिय आहेत. कुणाला पैसे लागल्यास दलालाच्या माध्यमातून सावकार पैसे उपलब्ध करून देतात. शेतकऱ्याला पैसे हवे असल्यास शेतीची पक्की खरेदी करून पैसे दिले जाते. त्यातही पैसे देताना दरमहा १० टक्के व्याज आकारून वर्षभराचे व्याजही कर्ज देतानाच वसूल केले जाते. शेतकऱ्याला हा प्रकार दिसत असला तरी नाईलाजाने सावकाराकडून पैसे घ्यावेच लागते. शेतीसोबतच सोने-चांदी गहाण ठेवून कर्ज दिले जाते. बंदी भागातील अनेक गावात आज प्रत्येक शेतकरी सावकाराच्या विळख्यात अडकला आहे. सहकार विभागाला हा अवैध सावकारीचा प्रकार माहीत आहे. काही जणांनी तक्रारीही केल्या. मात्र सावकाराच्या दबावाने कुणावरच कारवाई झाली नाही. पोलीसही या प्रकारात हतबलच दिसून येतात. बंदी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या पक्की खरेदी सावकारांच्या नावाने असल्याचे दिसून येते. सावकार विरोधी अधिनियम अस्तित्वात येऊनही कारवाई होत नाही. बंदी भागातील आदिवासी हा प्रामाणिक आणि शब्दाला जागणारा आहे. आपल्याला कर्ज दिले म्हणजे सावकाराने उपकारच केले, अशी त्याची भावना असते. याच भावनेतून तो तक्रार करायला जात नाही आणि याच मानसिकतेचा फायदा सावकार घेतात. (शहर प्रतिनिधी)सावकारीत शेतीची पक्की खरेदीसावकारीत पैसे देताना सावकार शेतकऱ्यांकडून शेताची पक्की खरेदी करून घेतात. त्यामुळे शेतकऱ्याने पैसे दिले नाही तरी त्यांना कुठे धावपळ करावी लागत नाही. सरळ शेतावर ताबा बसविला जातो. अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या अशाच पद्धतीने सावकारांच्या घशात गेल्या आहे. नाईलाजाने शेतकरी सावकाराचे कर्ज घेतो.