शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी सुटतात निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:26 IST

जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ १५ टक्केच गुन्हेगारांचा दोष न्यायालयात सिद्ध होऊ शकला. कनिष्ठ न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. २०१८ मध्ये दाखल गुन्ह्यावर लागलेल्या न्यायालयीन निकालावरून हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देदोषसिद्धी केवळ १५ टक्के : कनिष्ठ न्यायालयातील ८५ टक्के गुन्ह्यांत शिक्षा

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ १५ टक्केच गुन्हेगारांचा दोष न्यायालयात सिद्ध होऊ शकला. कनिष्ठ न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. २०१८ मध्ये दाखल गुन्ह्यावर लागलेल्या न्यायालयीन निकालावरून हे स्पष्ट झाले आहे. पोलीस यंत्रणेच्या तपासातील त्रृटींमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फावत असल्याचे स्पष्ट होते. एकंदर न्यायालयाने निकाल दिलेल्या गुन्ह्यातील दोष सिद्धीची सरासरी ही ४४ टक्के इतकी आहे. किरकोळ गुन्ह्यांमध्ये ३९.६३ टक्के आरोपींना शिक्षा झाली आहे.गंभीर गुन्ह्यातील दोष सिद्धीचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जातात. यात प्रामुख्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना स्वतंत्र पथकांकडून अटक केली जाते. प्रत्यक्ष तपास मात्र पोलीस ठाण्यातील यंत्रणेकडून करून घेतला जातो. ही यंत्रणा न्यायालयात दोषारोपपत्र सादर करते.यामुळे गुन्ह्याचे ‘मेमोरॅन्डम’ आणि प्रत्यक्ष घटना यात बरीच तफावत असते. स्थानिक गुन्हे शाखेकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जाते. बरचेदा गुन्हा कबूल करण्यासाठी आरोपीला हैदराबाद कस्टडीत ठेवून ट्रिटमेंट दिली जाते. नंतर हा गुन्हेगार पोलीस ठाण्यातील यंत्रणेकडे दोषारोपपत्र तयार करण्यासाठी सुपूर्द केला जातो. तेव्हा त्याने पथकापुढे दिलेली कबुली रेकॉर्डवर आणताना तपास अधिकाऱ्याची दमछाक होते. अनेकदा प्रकरण न्यायालयात साक्षी पुराव्याला लागल्यानंतर साक्षीदारच फितूर होतो. खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांकडून ‘क्रॉस’ घेतली जाते, तेव्हा दोषारोपत्रातील घटनाक्रम आणि अटकेची कारवाई यात तफावत दिसून येते.याच कमजोर कड्या पकडून दोषारोपपत्राची चिरफाड केली जाते. परिणामी याचा फायदा गुन्हेगाराला मिळतो.जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हजार १८८ गंभीर गुन्हे दाखल झाले. यात सत्र न्यायालयात २४८ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले. तर ४१ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली. कनिष्ठ न्यायालयात २ हजार ६६० आरोपी निर्दोष झाले. तर २ हजार २३९ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली. साधारणत: कनिष्ठ न्यायालयात चालणाºया गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेची कारवाई पोलीस ठाणे स्तरावरच होते. अटकेची कारवाई करणाºया अधिकाºयाकडे गुन्ह्याचा तपास दिला जातो. त्यामुळे दोषारोपपत्रात विशेष उणीवा राहत नाही. यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण हे ८५ टक्के आहे.किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण ३९.४१ टक्के आहे. यातही सत्र न्यालयातील दाखल ९ प्रकरणांपैकी ६ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष झाले. तर केवळ ३ खटल्यात शिक्षा झाली. कनिष्ठ न्यायालयात ३ हजार ११८ गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटले.दोन हजार ५३ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. गंभीर प्रकरणात पोलीस तपास भरकटत असल्याचे न्यायालयातील निकालावरून स्पष्ट होते.मे २०१९ पर्यंत २० टक्के शिक्षाजानेवारी ते मे २०१९ या पाच महिन्यांतील गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेचे प्रमाण २० टक्के आहे. आतापर्यंत २ हजार २६६ पैकी सत्र न्यायालयात ८६ गुन्ह्यात आरोपी निर्दोष झाले आहेत. तर २१ गुन्ह्यात शिक्षा झाली. कनिष्ठ न्यायालयात एक हजार ४२४ गुन्ह्यात आरोपी निर्दोष झाले. तर ७३५ गुन्ह्यात शिक्षा झाली. याची सरासरी ३४ टक्के आहे. किरकोळ गुन्ह्यात ३० टक्के प्रकरणांत शिक्षा झाली. यामध्ये सत्र न्यायालयात ४५ गुन्ह्यात आरोपी निर्दोष तर ६ प्रकरणात शिक्षा लागली आहे. कनिष्ठ न्यायालयात १ हजार ७७० खटल्यात आरोपी निर्दोष झाले असून ७५७ गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रत्येक क्राईम मिटींगमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या जातात. त्याचा अपेक्षित परिणाम सध्या तरी होताना दिसत नाही.