शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

33 हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेची मेहनत, स्वयंसेवी संस्थांची धडपड अन् रुग्णांची इच्छाशक्ती हेच औषध

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या अत्र-तत्र-सर्वत्र कोरोनाने भयकंप उडविला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३९ हजार लोकांना या विषाणूने ‘बाटविले’ हे खरेच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त लोकांनी कोरोनालाच हरविले, हेही दिलासादायक वास्तव आहे. संशयास्पद वाटलेल्या तब्बल सव्वातीन लाख लोकांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यातील तीन लाख नागरिकांना कोरोनाचा स्पर्शही झाला नसल्याचे अहवालात सिद्ध झाले. याचाच अर्थ, कोरोना जवळपास येऊनही तीन लाख लोकांनी त्याला यशस्वीपणे हुलकावणी दिली; तर ज्या ३९ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यातील तब्बल ३३ हजार लोकांनी अवघ्या आठवडाभरात कोरोनावर मात केली. आरोग्य यंत्रणेची रात्रंदिवस धडपड अन् रुग्णांची स्वत:ची इच्छाशक्ती हेच कोरोनावर पहिले औषध ठरले. ‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली. धंदे बुडाले, रोजगार गेले, व्यापार थांबला, कोरोनाच्या आजारापेक्षाही मानसिक आजारांनी अनेकांना पछाडले. रोज येणारे रुग्णवाढीचे आकडे लोकांना घाबरवून सोडत आहेत. पण त्यासोबतच रोज कोरोनामुक्त होणाऱ्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? एकदा स्वत:लाच विचारून बघा. आपल्याला यापूर्वी कधीच ताप आला नव्हता? खोकला झाला नव्हता? झालाच होता. आपण अनेकदा रुग्णालयात राहून आलो. बरे झालो. मग कोरोना आला म्हणून एवढे हतबल वाटून घेण्याचे कारण नाही. आपल्या एखाद्या मित्राला साधा खोकला आला म्हणून मनात शंकेची पाल चुकचुकू द्यायची नाही. कोरोनाला हरविण्याचे साधे नियम आहेत. तेही विनापैशाचे. गर्दी करायची नाही, एकमेकांपासून थोडे अंतर राखायचे, वारंवार हात धुवायचे, तोंडावर मास्क लावायचा, जरा शंका वाटली, तर तपासणी करून घ्यायची... बस्स! २७ लाख ७५ हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३९ हजार नागरिकांना कोरोना झाला. त्यातील ३३ हजार ३३४ लोक ठणठणीत बरेही झाले. त्यामुळे कोरोनाला घाबरून रोजचे जगणे अवरुद्ध करून घेण्यात काहीच हशील नाही. उलट, शासनाने घालून दिलेले नियम पाळून उरल्यासुरल्या विषाणूलाही पिटाळून लावा. जबाबदार बना, गर्दी टाळा, मास्क लावा आणि युद्ध जिंका. 

ज्यावेळी सोयी नव्हत्या तेव्हा जिंकलो, तर आता का नाही? यवतमाळात ७०-८० वर्षांपूर्वी प्लेग आला होता. तेव्हा आजच्याएवढी आरोग्य यंत्रणा अद्ययावत नव्हती. तरही प्लेगच्या महामारीतून माणसे वाचली. वाचविली गेली. आता एकविसाव्या शतकात कोरोना आलेला असताना वैद्यकीय शास्त्रही पुढारलेले आहे. कोरोनावर औषध मिळाले नसले, तरी केवळ सात आठ महिन्यांतच लस शोधली गेली. काही साधनांचा तुटवडा असला, तरी रुग्ण कसा वाचवायचा, हे डाॅक्टरांना माहिती आहे. जुन्या काळात प्लेग संपवता आला, तर आता आधुनिक काळात कोरोनालाही संपवताच येईल. कोणीही अवसान गाळून बसण्याची अजिबात गरज नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या