शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

वनाधिकार्‍यांचे निलंबन मागे २५ कोटींचा रोहयो घोटाळा

By admin | Updated: May 12, 2014 00:14 IST

पाच जण राजकीय वरदहस्तातून पुन्हा खुर्चीत

सतीश येटरे - राज्यभर गाजलेल्या पांढरकवडा वनविभागातील २५ कोटींच्या रोहयो घोट्याळ्यातील पाच वनाधिकार्‍यांचे निलंबन चक्क मागे घेण्यात आले. राजकीय वरदहस्तातून अवघ्या सहा महिन्यात वनाधिकारी पुन्हा कामावर रूजू झाले आहे. त्यामुळे आता या घोटाळ्याची चौकशी तर दडपली जाणार नाही ना, अशी शंका खुद्द वनविभागातूनच व्यक्त केली जात आहे. सहाय्यक उपवनसंरक्षक हरिश्चंद्र कांबळे, वनपरिक्षेत्रधिकारी व्ही.एच. मळघणे, अरूण मेत्रे, जी.जी. वानखेडे, ए.ए. शेख अशी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यात निलंबन मागे घेतलेल्या वनाधिकार्‍यांची नावे आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात यवतमाळ वनवृत्तातील पांढरकवडा वन विभागात रोजगार हमी योजनेच्या कामात सुमारे २५ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या घोटाळ्याची चौकशी रोजगार हमी योजना कार्यालयाचे अभियंता गुलाबराव भोळे यांच्याकडे सोपविली. त्यांनी केलेल्या चौकशीत झरीजामणी, पाटणबोरी, पांढरकवडा, पारवा येथील जंगलातून लाखो रूपयांची कामे बेपत्ता असल्याचे पुढे आले. एवढेच नाहीतर अनेक मृत मजूर या कामांवर राबल्याचे दर्शवून त्यांच्या नावावर मजुरीही काढण्यात आली. उपवनसंरक्षक (डीएफओ) आणि सहाय्यक उपवनसंरक्षक (एसीएफ) यांना रोहयो कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार नसताना वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या अधिकारावर गदा आणत तसे केल्याचेही आढळून आले. अभियंता भोळे यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकारी मुद्गल यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो अमरावती येथील मग्रारोहयोच्या अधिकार्‍यांकडे पाठविला. त्यामध्ये पाच वनाधिकारी आणि काही कर्मचार्‍यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला होता. चौकशी अहवालाची गंभीर दखल घेत सुमारे सहा महिन्यांपूर्वी मग्रारोहयो आयुक्तांनी पांढरकवडा वनविभागात कार्यरत सहाय्यक उपवनसंरक्षक हरिश्चंद्र कांबळे, प्रादेशिक वनपरिक्षेत्रधिकारी व्ही.एच. मळघणे, पाटणबोरी वनपरिक्षेत्रधिकारी अरूण मेत्रे, रोहयो वनपरिक्षेत्रधिकारी जी.जी. वानखेडे, रोहयो वनपरिक्षेत्राधिकारी ए.ए. शेख या पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यावरून सुमारे सहा महिन्यांपूर्वी या पाचही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले. निलंबित झाल्यापासूनच यातील काही अधिकार्‍यांनी निलंबन मागे घेण्यासाठी राजकीय मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामध्ये एका मंत्र्याकरवी आणि आर्णी येथील दलालाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र नॉनकरप्ट अशी ओळख असलेले यवतमाळ वनवृत्ताचे तत्कालीन मुख्यवनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी यांनी हा दबाव झुगारून निलंबन मागे घेण्यासाठी सकारात्मक अहवाल दिला नाही. त्यानंतर मात्र सीसीएफ त्यागी यांची बदली होताच पुन्हा या अधिकार्‍यांनी निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न चालविले. त्यातूनच १० ते १२ दिवसांपूर्वी खुद्द मग्रारोहयो आयुक्तांच्या आदेशानेच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. राजकीय दबाव, वाशिलेबाजी आणि आर्थिक हितसंबंधातून या अधिकार्‍यांनी खुर्ची मिळविली, अशी ओरड आता खुद्द वनवर्तुळातूनच होत आहे. तसेच ज्याप्रमाणे निलंबन मागे घेण्यात हे घोटाळेबाज अधिकारी यशस्वी झाले. त्याप्रमाणेच २५ कोटींचा रोहयो घोटाळाही ते दडपतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.