शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: February 22, 2015 02:04 IST

सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

दारव्हा : सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये दोन महिलेसह एका युवतीचासुद्धा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येची प्रकरणे तालका, जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने त्यामधील केवळ चारच आत्महत्या पात्र ठरविल्या. त्यामुळे पात्र ठरलेल्या कुटुंबांनाच शासनाची मदत मिळाली. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी आहे. त्यामध्ये प्रल्हाद जगराम जाधव हनुमान नगर, संतोष अरुण दुरटकर, मांगकिन्ही, सचिव प्रदीप मलमकर लोही, जमनाबाई शिवासुळ किन्ही वळगी, धनेश्वर नामदेव ढेंबे दारव्हा, संतोष प्रभाकर अलोणे सायखेड, लखन महादेव डोंगरे महतोली, शेषराव डोमाजी जाधव चानी, प्रल्हाद झिता राठोड लाखखिंड, सुभाष पुंडलिक धुरट घनापूर, अशोक मणजी पवार पळशी, सदाशिव बाबू पावडे डोल्हारी, पुंडलिक केशव रामगडे चिचबर्डी, मनकर्णा काशीराम ठोंबरे गणेशपूर, तुकाराम बाबूलाल चव्हाण भोपापूर, पुनाजी रोडबाजी मनवर मांगकिन्ही, सीमा राजाभाऊ देशमुख धामणगाव आदींचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयाची मदत दिल्या जाते. परंतु त्याकरिता काही निकष आहे. पात्र आत्महत्या निवडीकरिता तालुका व जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या छाननीत वरील चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या. उर्वरित १३ आत्महत्या अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा लाभ मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)