शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: February 22, 2015 02:04 IST

सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

दारव्हा : सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये दोन महिलेसह एका युवतीचासुद्धा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येची प्रकरणे तालका, जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने त्यामधील केवळ चारच आत्महत्या पात्र ठरविल्या. त्यामुळे पात्र ठरलेल्या कुटुंबांनाच शासनाची मदत मिळाली. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी आहे. त्यामध्ये प्रल्हाद जगराम जाधव हनुमान नगर, संतोष अरुण दुरटकर, मांगकिन्ही, सचिव प्रदीप मलमकर लोही, जमनाबाई शिवासुळ किन्ही वळगी, धनेश्वर नामदेव ढेंबे दारव्हा, संतोष प्रभाकर अलोणे सायखेड, लखन महादेव डोंगरे महतोली, शेषराव डोमाजी जाधव चानी, प्रल्हाद झिता राठोड लाखखिंड, सुभाष पुंडलिक धुरट घनापूर, अशोक मणजी पवार पळशी, सदाशिव बाबू पावडे डोल्हारी, पुंडलिक केशव रामगडे चिचबर्डी, मनकर्णा काशीराम ठोंबरे गणेशपूर, तुकाराम बाबूलाल चव्हाण भोपापूर, पुनाजी रोडबाजी मनवर मांगकिन्ही, सीमा राजाभाऊ देशमुख धामणगाव आदींचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयाची मदत दिल्या जाते. परंतु त्याकरिता काही निकष आहे. पात्र आत्महत्या निवडीकरिता तालुका व जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या छाननीत वरील चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या. उर्वरित १३ आत्महत्या अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा लाभ मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)