शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका महिनाभर ‘लाॅकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

 दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याच्या तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही. परंतु, आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले.

ठळक मुद्देपरीक्षा लांबल्या : साहित्य सांभाळून ठेवण्याचे शाळांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरवर्षी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा घेते; पण यंदा परीक्षेमुळे खुद्द बोर्डाचीच धाकधूक वाढली आहे. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर लांबणीवर पडल्या; पण तत्पूर्वीच शाळांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर ‘कस्टडी’त सांभाळून ठेवण्याची संवेदनशील जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे.  दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याच्या तारखेबाबत अद्याप निश्चितता नाही. परंतु, आधी एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करून टाकले. अमरावती विभागीय मंडळानेही यवतमाळ, पुसद येथे प्रतिनिधी पाठवून शाळांपर्यंत साहित्य पोहोचविले. मात्र, परीक्षा केंद्रांपर्यंत हे साहित्य पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, ए-बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका, आदींचा समावेश आहे. आता हे साहित्य केंद्र संचालकांनीच स्वत:च कस्टडीत जपून ठेवावे, संबंधित शाळांना वाटप करू नये, असे आदेश गुरुवारी अमरावती विभागीय मंडळाच्या सहसचिव डाॅ. जयश्री राऊत यांनी दिले आहेत. परंतु, जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, तेथेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ही वाढीव संख्या पाहता अनेक केंद्र संचालकांनी आपल्या उपकेंद्रांना हे साहित्य तडकाफडकी वाटून टाकल्याचीही शक्यता आहे. आता अशा ‘लाॅक्ड’ उत्तरपत्रिकांबाबत गफलत झाल्यास परीक्षेत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे.  

जिल्ह्यातील ६७ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला  जिल्ह्यात तब्बल ६७ हजार विद्यार्थी यंदा दहावी-बारावीला आहेत. कोरोनामुळे शाळा होवो न होवो, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने या विद्यार्थ्यांनी जमेल तशी परीक्षेची तयारी केली आहे. त्यात शाळांनीही विविध उपक्रमांतून तयारी करवून घेतली. परंतु, आता परीक्षेची तारीख महिनाभर लांबली. त्यातही कोरोनामुळे परीक्षा नेमकी कधी घेतली जाणार, घेणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीएसईने तर दहावीची परीक्षाच रद्द केल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्येही द्विधावस्था आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा