शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

१७ वर्षांचा संघर्ष येणार का फळाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

साहेबराव राठोड शेलूबाजार : राज्यभरातील जी गावे ग्रामपंचायतीसाठी पात्र आहेत; परंतु तो दर्जा अद्याप त्यांना मिळाला नाही, अशा गावांचे ...

साहेबराव राठोड

शेलूबाजार : राज्यभरातील जी गावे ग्रामपंचायतीसाठी पात्र आहेत; परंतु तो दर्जा अद्याप त्यांना मिळाला नाही, अशा गावांचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही तो लोकसंख्येच्या पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या पांगरी महादेव या गावाला आता तरी ग्रामपंचायतीचा दर्जा मिळणार का? १७ वर्षांचा संघर्ष फळाला येणार का? हे गाव या योगे विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अकोला जिल्ह्यातून विभाजन होत वाशिम जिल्ह्याची १ मे १९९८ रोजी नव्याने निर्मिती झाली. या घडामोडीला सध्या २३ वर्षे पूर्ण झाली. जिल्हा निर्मितीच्या पाच वर्षांनंतर पांगरी महादेव हे गावही अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात वर्ग करण्यात आले; मात्र ते कोणत्याही ग्रामपंचायतीला अद्यापपर्यंत जोडण्यात आलेले नाही. नजीकच्या तऱ्हाळा ग्रामपंचायतीकडून पांगरीतील गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात; मात्र विकासकामांच्या बाबतीत आजही पांगरी हे गाव कोसोदूर असल्याचे चित्र आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या गावाकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासंबंधी गत अनेक वर्षांपासून गावकरी पाठपुरावा करीत आहेत; परंतु या लढ्याला आजही यश आलेले नाही. आता शासनानेच नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत प्रस्ताव मागविले असल्याने जिल्हा प्रशासन तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींनी पांगरी महादेव येथील मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असा सूर उमटत आहे.

.....................

बाॅक्स :

शासकीय योजनांपासून १७ वर्षांपासून गावकरी वंचित

पांगरी महादेव हे गाव पूर्वी बार्शीटाकळी (जि. अकोला) तालुक्यातील सावरखेड ग्रामपंचातीत समाविष्ट होते. कालांतराने ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समाविष्ट झाले; मात्र गाव विकासाचे संभाव्य अंदाज पत्रक अथवा जमा - खर्च पत्रक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या १७ वर्षांपासून ग्रामस्थ शासकीय योजनांपासून वंचित आहेत.

......................

कोट :

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेकडून अमरावती विभागीय आयुक्तालयाकडे पांगरी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो १९ डिसेंबर २०१९ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाला मिळाला. तसेच ३ जानेवारी २०२० रोजी ग्रामविकास मंत्रालयास तो प्राप्त झाला; मात्र प्रश्न आजही जैसे थे आहे. किमान आता तरी पांगरीला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा, अशी आपली मागणी आहे.

- विष्णू मंजुळकर

सामाजिक कार्यकर्ते, पांगरी महादेव

.................

कोट :

पांगरी महादेव या गावाला परिसरातील अन्य ग्रामपंचायतीला जोडण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाने पूर्वीपासूनच ठोस प्रयत्न केले; मात्र त्यास अद्यापपर्यंत यश आलेले नाही. शासनस्तरावर नव्याने प्रस्ताव पाठविण्यासंबंधी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या वेळीही सकारात्मक प्रयत्न राहतील.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम