शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

परीक्षार्थींना शुल्क परताव्याची प्रतीक्षा !

By admin | Updated: August 18, 2016 00:48 IST

शिक्षण विभागाने आता मागविली माहिती : दुष्काळी मदतीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळालाच नाही.

संतोष वानखडेवाशिम, दि. १७: दुष्काळग्रस्त वाशिम जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या परीक्षा शुल्काचा परतावा अद्यापही मिळाला नाही. संतापजनक प्रकार म्हणजे आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंची माहिती मागविण्याला सुरूवात केली आहे.५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याबरोबरच अन्य प्रकारच्या सवलती दिल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गावांची सन २0१५-१६ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आली होती. खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आलेल्या गावांना महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २0१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमिन महसुलात सुट, वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सुट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. या निर्णयानुसार दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून विलंबाने जाहिर झाला. तोपर्यंंत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांंना सदर शुल्क परत मिळणे अनिवार्य आहे. यावर्षी १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंनी बारावीची परीक्षा दिली तर २0 हजार ९८२ विद्यार्थ्यांंनी दहावीची परीक्षा दिली. दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क रकमेत फरक आहे. बारावीचे परीक्षा शुल्क कला, वाणिज्य व विज्ञान या शाखानिहाय आकारले जाते. बारावीचे परीक्षा शुल्क सरासरी ४00 रुपये गृहित धरले तर एकूण ६४ लाख ७२ हजार ४00 रुपये अशी रक्कम होते. दहावीचे परीक्षा शुल्क सरासरी २४0 रुपये गृहित धरले तर ५0 लाख ३५ हजार ६८0 रुपये अशी रक्कम होते. दोन्ही मिळून एकूण एक कोटी १५ लाख आठ हजार ८0 रुपये परीक्षा शुल्काची रक्कम होते. यापैकी किती विद्यार्थ्यांंना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे, याचा लेखाजोखा शिक्षण विभागाने यापूर्वीच संकलीत करणे अपेक्षीत होते. मात्र, तसा प्रयत्न झाला नसल्याने पात्र विद्यार्थ्यांंंचे परीक्षा शुल्क शासन दरबारी पडून आहे. दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या शुल्काची माहिती ऑगस्ट महिन्यात संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक आणि त्यानंतर शिक्षण संचालकांकडे सादर होईल. या प्रक्रियेला किमान एक महिना कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते. तोपर्यंंंत पात्र विद्यार्थ्यांंंसमोर प्रतिक्षा करण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही.