शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींना शुल्क परताव्याची प्रतीक्षा !

By admin | Updated: August 18, 2016 00:48 IST

शिक्षण विभागाने आता मागविली माहिती : दुष्काळी मदतीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळालाच नाही.

संतोष वानखडेवाशिम, दि. १७: दुष्काळग्रस्त वाशिम जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या परीक्षा शुल्काचा परतावा अद्यापही मिळाला नाही. संतापजनक प्रकार म्हणजे आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंची माहिती मागविण्याला सुरूवात केली आहे.५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याबरोबरच अन्य प्रकारच्या सवलती दिल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गावांची सन २0१५-१६ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आली होती. खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आलेल्या गावांना महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २0१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमिन महसुलात सुट, वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सुट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. या निर्णयानुसार दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून विलंबाने जाहिर झाला. तोपर्यंंत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांंना सदर शुल्क परत मिळणे अनिवार्य आहे. यावर्षी १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंनी बारावीची परीक्षा दिली तर २0 हजार ९८२ विद्यार्थ्यांंनी दहावीची परीक्षा दिली. दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क रकमेत फरक आहे. बारावीचे परीक्षा शुल्क कला, वाणिज्य व विज्ञान या शाखानिहाय आकारले जाते. बारावीचे परीक्षा शुल्क सरासरी ४00 रुपये गृहित धरले तर एकूण ६४ लाख ७२ हजार ४00 रुपये अशी रक्कम होते. दहावीचे परीक्षा शुल्क सरासरी २४0 रुपये गृहित धरले तर ५0 लाख ३५ हजार ६८0 रुपये अशी रक्कम होते. दोन्ही मिळून एकूण एक कोटी १५ लाख आठ हजार ८0 रुपये परीक्षा शुल्काची रक्कम होते. यापैकी किती विद्यार्थ्यांंना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे, याचा लेखाजोखा शिक्षण विभागाने यापूर्वीच संकलीत करणे अपेक्षीत होते. मात्र, तसा प्रयत्न झाला नसल्याने पात्र विद्यार्थ्यांंंचे परीक्षा शुल्क शासन दरबारी पडून आहे. दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या शुल्काची माहिती ऑगस्ट महिन्यात संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक आणि त्यानंतर शिक्षण संचालकांकडे सादर होईल. या प्रक्रियेला किमान एक महिना कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते. तोपर्यंंंत पात्र विद्यार्थ्यांंंसमोर प्रतिक्षा करण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही.