शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

दूषित पाण्यावरच भागविली जातेय तहान!

By admin | Updated: May 1, 2016 01:07 IST

सायखेडा व राजगावात पाणी पेटले; टँकर न पाठविल्यास ‘रास्ता रोको’.

शिखरचंद बागरेचा / वाशिमवाशिम तालुक्यातील सायखेडा व राजगाव येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. गावालगतच्या एका विहिरीतील गढूळ व दूषित पाण्यानेच नागरिकांना तहान भागवावी लागत असल्याने साथरोग उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पर्यावरणाचा र्‍हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतुमानात बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईच्या दाहकतेत होरपळून निघत आहेत. वाशिम तालुक्यातील सायखेडा, राजगाव परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, तळ गाठलेल्या विहिरीतील गढळू पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पाणी शुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध असणार्‍या नागरिकांचा अपवाद वगळता उर्वरित नागरिकांना गढूळ पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे. शेतामधून पाच किमी अंतरावरून महिला व पुरुषांना पाणी आणावे लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या सायखेडा गावातील सर्व पाणवटे, विहीर, कूपनलिका आदी पाण्याचे स्रोत आटले असून, काही ठिकाणचे पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य नाही. तथापि, पर्यायी व्यवस्था नसल्याने गढूळ पाण्यात ह्यजीवन ड्रॉपह्ण टाकून पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सायखेडचे रहिवासी अरविंद अहिरे पाटील यांनी २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देऊन सायखेडा व राजगाव येथील भीषण परिस्थिती कथन केली. दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी सायखेडा व राजगाव येथे तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी अहिरे यांच्यासह गणेश वायचाळ, गजानन वानखेडे, गणेश देशमुख, दामू कव्हर आदी ग्रामस्थांनी केली.