शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विद्यार्थ्यांना मिळणार ई-कृषी पदवी!

By admin | Updated: October 12, 2014 00:37 IST

शेतक-यांना देणार ई-कृषी प्रशिक्षण; कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचा प्रस्ताव.

राजरत्न सिरसाट/अकोला कृषी शिक्षणात आमूलाग्र बदल करतानाच, कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 'ई-कृषी शिक्षण' पदवी लवकरच देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनादेखील ई-कृषी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार असून, तसा प्रस्ताव नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर कृषी क्षेत्रात 'ई-कृषी शिक्षण' पदवी देणारा भारत पहिला देश ठरणार आहे.कृषी शिक्षणामध्ये देशपातळीवर समानता आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संपूर्ण कृषी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करू न देण्यात येत आहे. भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस् थेने 'ई-कृषी शिक्षण' हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. या माध्यमातून कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन केले जाणार आहेत. कृषी क्षेत्रात 'नि:शुल्क ज्ञान प्रसार' हा या ऑनलाईन सेवेमागील उद्देश आहे. अर्थात शिक्षकांनी शिकविण्यासोबतच , शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये (इन्टरएक्टीव्ह क्लास) संवाद, चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कृषी शिक्षणात संगणकीय क्रां तीच्या अनुषगांने लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठीच देशातील ७१ कृषी विद्यापीठांमध्ये जनजागृती चर्चासंत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकर्‍यांना शेतीसंबंधीचे प्रशिक्षणही ई-कृषी शिक्षणाद्वारे देण्यात येईल. यासाठीचा आराखडा भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने तयार केला आहे. हंगामनिहाय पिकांची माहिती, कोणती पिके घ्यावीत, आदीसंदर्भात इंत्थभूत माहिती प्रशिक्षणाद्वारे शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नव कृषी तंत्रज्ञान, संशोधित पिकांच्या वाणांचा उपयोग करू न कमी खर्चात अधिक उत्पादन देणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांनी करावा, यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. देशातील कृषी विद्यापीठांनी कमी खर्चात उत्पादन देणार्‍या हजारो पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत; त थापि शेतकर्‍यांपर्यंत या पिकांच्या जातींचा प्रसार झालेला दिसत नाही. ई-कृषी शिक्षणाच्या माध्यमा तून ही सर्व माहिती खुली राहणार असल्याने शेतकर्‍यांना या संगणक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेला वाटत असल्याने, यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. 'आयसीएआर'अंतर्गत कार्यरत भारतीय सांख्यिकी संशोधन संस्थेने यावर काम सुरू केले आहे. सध्या फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी ते पशू विज्ञान, असे सर्वच विषय ऑनलाईन व ऑफलाईन टाकण्यात आले आहेत.ई-कृषी शिक्षण पदवी देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून, यावर काम करण्यात येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात विद्यार्थ्यांला पदवी व शेतकर्‍यांना ई-कृषी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयसीएआरचे मानसेवी शास्त्रज्ञ डॉ.आर.सी. गोयल यांनी कळवले आहे.