शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

नजरा आकाशाकडे खिळल्या

By admin | Updated: July 8, 2014 22:54 IST

पावसाअभावी सुकत असेलेले पिकं वाचविण्यासाठी धडपडणार्‍या शेतकर्‍यांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत.

वाशिम : जिल्ह्याच्या काही भागात यंदा मृग नक्षत्रात हजेरी लावणार्‍या पावसाने त्यानंतर मात्र दडी मारली आहे. परिणामी, शेतकर्‍यांच्या पहिल्या पेरण्या उलटल्या असुन जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. पावसाअभावी सुकत असेलेले पिकं वाचविण्यासाठी धडपडणार्‍या शेतकर्‍यांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत. वातावरणातील बदलाची झळ सर्वच क्षेत्रांना पोहचते. पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी लोटत आला असताना पाहिजे तसा पाऊस न आल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भाजीपाल्यांच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले असल्याने प्रत्येकाला पाऊस यावा असे वाटत असताना वरूणराजा मात्र रूसलेला दिसून येत आहे. वरूणराजाची कृपा व्हावी याकरिता विविध ठिकाणी धोंडया, देवी देवतांना अभिषेक केल्या जात आहे. वाशिम तालुक्यातील जांभरूण परिसरात अनेक शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यात या पेरण्या पावसाअभावी उलटल्या आहेत. दुबार पेरणी करीता पुन्हा पावसाची प्रतीक्षा या भागातील शेतकरी करताना दिसून येत आहे. रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथे सुरूवातीला पेरणी लायक पाऊस पडल्याने जवळपास शंभर टक्के शेतकर्‍यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर एकदाही पाऊस न आल्याने केलेली पेरणी उलटणार असल्याच्या भितीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाशिम जिल्हयात असलेल्या लघु व मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने यावर्षी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. मालेगाव तालुक्यातील अनेक धरणे कोरडी तर काही धरणातील पाण्याची पातळीत घट झाली आहे. पाणी असतांना शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला असल्याने व आता त्यांना सुध्दा पाणी नसल्याने सर्वासमोर संकट उभे राहिले आहे.