शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

प्रचार तोफा अजूनही बारूदीविनाच!

By admin | Updated: October 3, 2014 00:35 IST

अद्याप वाशिमसह कारंजालाड येथील निवडणुक प्रचारसभा प्रभावहीन.

दिवाकर इंगोले /कारंजा(वाशिम)विधानसभा निवडणूक पंधरा दिवसांवर आली तरी, कोणत्याही पक्षाने आपल्या निवडणूक तोफात पुरेशी बारूद भरलीच नाही. त्यामुळे प्रचारयात्रा फार प्रभावी झाली नाही. तथापि, उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्रचार दौरे मात्र सुरू झाले. अद्याप चिन्ह वितरित झाले नाही. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडी तुटल्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आजपर्यंत परस्परांच्या सहकार्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत; परंतु त्यांची अद्यापही तशी मानसिकता तयार व्हायची आहे.युतीतील मित्रपक्ष आता शत्रू पक्ष म्हणून परस्पराशी स्पर्धा करणारा व आपल्या पक्षाला सरस ठरविणारा निर्णायक प्रचार अद्याप सुरू झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांची आघाडी बिघाडी झाल्यामुळे उमेदवाराचा मिळून प्रचार करणारे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहे. पूर्वी मित्र असलेल्यांना आपल्याच मित्राच्या विरुद्ध गरळ ओकावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या कारंजा मतदारसंघात बहुरंगी लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण लढाई अगदी लक्षवेधी ठरणार आहे. महाभारतासारखे आपल्याच नातेवाइकांशी प्रचारयुद्ध पुकारायचे आहे. ग्रामीण भागात प्रचार सभेशिवाय अद्याप कारंजा शहरात गर्दीला अर्थ देणारी कोणतीही भव्य प्रचार सभा झाली नाही. यावर्षी ही निवडणूक बहुरंगी ठरणार आहे. थोड्याफार फरकाने उमेदवाराचा विजय होईल. कारंजा श्हराची हवा अद्याप कोणत्याही उमेदवाराला हात देण्याएवढी स्थिती दर्शविणारी नाही. सध्या सर्वच आघाड्यांवर सामसूम आहे.