शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

प्रचार तोफा अजूनही बारूदीविनाच!

By admin | Updated: October 3, 2014 00:35 IST

अद्याप वाशिमसह कारंजालाड येथील निवडणुक प्रचारसभा प्रभावहीन.

दिवाकर इंगोले /कारंजा(वाशिम)विधानसभा निवडणूक पंधरा दिवसांवर आली तरी, कोणत्याही पक्षाने आपल्या निवडणूक तोफात पुरेशी बारूद भरलीच नाही. त्यामुळे प्रचारयात्रा फार प्रभावी झाली नाही. तथापि, उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्रचार दौरे मात्र सुरू झाले. अद्याप चिन्ह वितरित झाले नाही. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडी तुटल्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आजपर्यंत परस्परांच्या सहकार्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत; परंतु त्यांची अद्यापही तशी मानसिकता तयार व्हायची आहे.युतीतील मित्रपक्ष आता शत्रू पक्ष म्हणून परस्पराशी स्पर्धा करणारा व आपल्या पक्षाला सरस ठरविणारा निर्णायक प्रचार अद्याप सुरू झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांची आघाडी बिघाडी झाल्यामुळे उमेदवाराचा मिळून प्रचार करणारे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहे. पूर्वी मित्र असलेल्यांना आपल्याच मित्राच्या विरुद्ध गरळ ओकावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या कारंजा मतदारसंघात बहुरंगी लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण लढाई अगदी लक्षवेधी ठरणार आहे. महाभारतासारखे आपल्याच नातेवाइकांशी प्रचारयुद्ध पुकारायचे आहे. ग्रामीण भागात प्रचार सभेशिवाय अद्याप कारंजा शहरात गर्दीला अर्थ देणारी कोणतीही भव्य प्रचार सभा झाली नाही. यावर्षी ही निवडणूक बहुरंगी ठरणार आहे. थोड्याफार फरकाने उमेदवाराचा विजय होईल. कारंजा श्हराची हवा अद्याप कोणत्याही उमेदवाराला हात देण्याएवढी स्थिती दर्शविणारी नाही. सध्या सर्वच आघाड्यांवर सामसूम आहे.