शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

स्वच्छतेसाठी रोज एक तास देण्याची कर्मचा-यांची शपथ

By admin | Updated: October 3, 2014 00:32 IST

गांधी जयंतीनिमित्त वाशिम जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम.

वाशिम : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयासह जि. प. परिसराची स्वच्छता करुन स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग नोंदविला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी जि. प. च्या वसंतराव नाईक सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एस. बायस, शिक्षण अधिकारी पेंदोर यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत स्तरावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंतीनिमित्त एरवी सर्व शासकीय कर्मचारी सुट्टीचा आनंद घेत असतात. आज मात्र सकाळी ९.00 वाजताच जि. प. चे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर होते. आपल्या कार्यालयाचा परिसर व फर्निचर आदींची साफसफाई करून या अभियानांतर्गत निर्मल कार्यालय उपक्रम राबविण्यात आला. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सर्व कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. सकाळी १0 वाजता सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अति. मुकाअ. डॉ. पवार यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे यांनी संचालन केले. यानंतर या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुमारे एक तास जिल्हा परिषदेसमोरील गाजर गवत उपटून परिसराची स्वच्छता केली.