शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

राजकीय अस्थिरतेमुळे कुणालाही बहुमत अशक्य

By admin | Updated: October 6, 2014 00:37 IST

लोकमत परिचर्चेत मान्यवरांचा सूर.

शिखरचंद बागरेचा/वाशिममहाराष्ट्र राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी तुटल्याने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असे चित्र दिसून येत असल्याचा सुर लोकमतच्या परिचर्चेतुन निघाला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय येथे रविवार ५ ऑक्टोबर रोजी आघाडी व युतीच्या घटस्फोटामुळे निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेमध्ये शहरातील प्रा. विजया जाधव, प्रा. अबरार मिर्झा, डॉ. राजीव अग्रवाल, प्रा.कमल अग्रवाल, उज्वलाताई उकळकर, संगिता उकळकर, व रोहिणी कळमकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला .राज्यातील नागरिकांना रस्ते, पाणी व विद्युत या मुलभुत समस्या भेडसावत असून संपूर्ण राज्याचा विकास होण्यासाठी कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन व्हावे असे विचार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. एक हाती सत्ता असल्यानेच राज्याचा विकास होऊ शकतो असे ठाम मत व्यक्त करताना राजकीय अस्थिरतेचे वारे कोणत्या दिशेने वाहतील हे सांगता येणे शक्य नाही. तरी या अस्थिरतेमुळे महाराष्ट्र राज्याची स्थिती दिल्ली सारखी तर होणार नाही अशी भितीही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.