शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मिनी मंत्रालयात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ कायमच !

By admin | Updated: October 5, 2014 01:50 IST

मालेगाव व वाशिम पंचायत समितीसह रिसोड, मंगरुळपीर न.प.मध्ये आघाडी.

संतोष वानखडे/वाशिमविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फारकत घेतली असली तरी, वाशिम जिल्हा परिषदेत मात्र दोन्ही काँग्रेस सत्तेचा संसार गुण्यागोविंदाने हाकत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाची ठिणगी जिल्हा परिषदेच्या संसारात काय ह्यआगह्ण लावते, यावर मिनी मंत्रालयाचे ह्यराजकारणह्ण अवलंबून आहे.घटस्थापनेच्या दिवशीच झालेल्या दोन राजकीय घटस्फोटांमुळे महाराष्ट्राचे राजकारण निराळ्या वळणावर जाऊन उभे राहिले आहे. २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपा युती व दीड दशके सत्तेच्या राजकारणात परस्परांना अवघड घडीतही हात देणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुटली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले आणि निकालानंतर दोघांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली. २00४ व २00९ ची निवडणूक दोघांनी एकत्रितपणे लढविली आणि पुन्हा सरकार स्थापन केले. २0१४ मध्ये सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीला सोळावं वरीस धोक्याचं ठरलं. १५ वर्षांची आघाडी फुटल्यानंतर जास्तीत-जास्त जागा स्वबळावर जिंकण्याचे आव्हान स्वीकारून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाचे लोण स्थानिक स्वराज्य संस्थेतही पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.