शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

मिनी मंत्रालयात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ कायमच !

By admin | Updated: October 5, 2014 01:50 IST

मालेगाव व वाशिम पंचायत समितीसह रिसोड, मंगरुळपीर न.प.मध्ये आघाडी.

संतोष वानखडे/वाशिमविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फारकत घेतली असली तरी, वाशिम जिल्हा परिषदेत मात्र दोन्ही काँग्रेस सत्तेचा संसार गुण्यागोविंदाने हाकत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाची ठिणगी जिल्हा परिषदेच्या संसारात काय ह्यआगह्ण लावते, यावर मिनी मंत्रालयाचे ह्यराजकारणह्ण अवलंबून आहे.घटस्थापनेच्या दिवशीच झालेल्या दोन राजकीय घटस्फोटांमुळे महाराष्ट्राचे राजकारण निराळ्या वळणावर जाऊन उभे राहिले आहे. २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपा युती व दीड दशके सत्तेच्या राजकारणात परस्परांना अवघड घडीतही हात देणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुटली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले आणि निकालानंतर दोघांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली. २00४ व २00९ ची निवडणूक दोघांनी एकत्रितपणे लढविली आणि पुन्हा सरकार स्थापन केले. २0१४ मध्ये सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीला सोळावं वरीस धोक्याचं ठरलं. १५ वर्षांची आघाडी फुटल्यानंतर जास्तीत-जास्त जागा स्वबळावर जिंकण्याचे आव्हान स्वीकारून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाचे लोण स्थानिक स्वराज्य संस्थेतही पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.