शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

विधानसभेच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

By admin | Updated: October 3, 2014 00:36 IST

रिसोड मतदारसंघातील चित्र.

विवेकानंद ठाकरे / रिसोड(वाशिम)जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिसोड मतदारसंघात आगामी १५ ऑक्टोबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिवंगत सुभाषराव झनक आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात वावरणार्‍या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती तुटल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी इरेस पेटले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबतही नेमकी तशीच परिस्थिती झाली. आघाडीत बिघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांसमोर उभे ठाकले. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक दुसर्‍यांदा नशीब आजमावत आहे. भाजपच्या अँड. विजयराव जाधव यांनी पाचव्यांदा रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून दंड थोपटणार्‍या शिवसेनेने जिल्हा परिषदेचे सदस्य विश्‍वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे निवडणूक रणसंग्रामामध्ये आहेत व भारिपतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काट्याची ठरणार आहे.