शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

विधानसभेच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

By admin | Updated: October 3, 2014 00:36 IST

रिसोड मतदारसंघातील चित्र.

विवेकानंद ठाकरे / रिसोड(वाशिम)जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिसोड मतदारसंघात आगामी १५ ऑक्टोबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिवंगत सुभाषराव झनक आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात वावरणार्‍या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती तुटल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी इरेस पेटले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबतही नेमकी तशीच परिस्थिती झाली. आघाडीत बिघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांसमोर उभे ठाकले. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक दुसर्‍यांदा नशीब आजमावत आहे. भाजपच्या अँड. विजयराव जाधव यांनी पाचव्यांदा रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून दंड थोपटणार्‍या शिवसेनेने जिल्हा परिषदेचे सदस्य विश्‍वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे निवडणूक रणसंग्रामामध्ये आहेत व भारिपतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काट्याची ठरणार आहे.