शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

वाशिम जिल्हयातील आरोग्य केंद्रच पडले आजारी

By admin | Updated: January 22, 2015 00:28 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात भौतिक सुविधांचा अभाव; अधिकारी व कर्मचा-यांचे अपडाऊन सुरूच.

वाशिम : जनतेचे आरोग्य अबाधित रहावे याकरीता असलेले जिल्हयातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी अनेक केंद्र आजारी पडले असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले. 

ग्रामीण भागातील जनतेवर प्राथमिक उपचार व्हावे याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अधिकारी , कर्मचार्‍यांची कमतरता व आवश्यक सुविधांचा अभावामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र नावापुरतेच दिसून येत आहेत. जिल्हयात एकूण २५ आरोग्य केंद्र व या अंतर्गत शेकडो उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रातचं पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत उपकेंद्राची गत तर भयावह आहे. उपकेंद्रामध्ये कधीच अधिकारी व कर्मचारी हजर दिसून येत नाही. जिल्हयात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वाशिम , मालेगाव व रिसोड तालुक्यात प्रत्येकी ४, कारंजा व मंगरूळपीर येथे प्रत्येकी ५ व मानोरा येथे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या अंतर्गत वाशिम तालुक्यात २५ उपकेंद्र , मालेगाव तालुक्यात २८ उपकेंद्र, मानोरा तालुक्यात २४ उपकेंद्र , मंगरूळपीर तालुक्यात २१ उपकेंद्र तर कारंजा तालुक्यात २५ उपकेंद्राचा समावेश आहे. जिल्हयात असलेल्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, स्वच्छता गृह, वॉल कंपाऊंड आदी सुविधा दिसून येत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून कोट्यवधी रुपयांचा खर्च कुठे केला,याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तब्बल १४ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी व ८४ पदांच्या अनुशेषाची झळ ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना सोसावी लागत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील तालुक्यातील १२४ गावातील नागरिकांची आरोग्याची जबाबदारी पार पाडणार्‍या आरोग्य खात्यात ३ वैद्यकीय अधिकार्‍यांसह एकूण ९ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेचा खेळखंडोबा होत आहे. हीच परिस्थितील इतरही तालुक्यात दिसून येत आहे. अधिकारी कर्मचार्‍यांची रिक्त पदे, आरोग्य केंद्रात उपस्थित न राहणे, अपडाऊन करणे, सोयी सुविधांचा अभाव, औषधी साठा नसणे या सर्व प्रकारांमुळे ग्रामीण भागातील जनतेला पाहिजे तसा उपचार मिळत नाही. मनुष्यबळाचा अभाव*जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात मनुष्यबळाचा अभाव असल्याची ओरड अधिकारी वर्गातून केल्या जात आहे.*अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते; मात्र, प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही.