शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

निवडणूकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या आघाडीवर

By admin | Updated: October 5, 2014 01:40 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

वाशिम : चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील तळागाळातील स्तरावर रोवला आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या स्तरावर झेप घेऊ पाहणार्‍या महिलांना पुरूषी वरचष्मा असलेल्या राजकारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकवून ठेवले आहे. राजकीय पक्ष सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी खात्रीचे नाणे म्हणून वापरताना दिसत आहेत.विशेष बाब म्हणजे प्रचारात महिला या पुरूष कार्यकर्त्यांपेक्षा आघाडीवर आहेत. राजकारणाचा पाया असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना सर्मथपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिकेतच अडविल्या गेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. जिल्ह्यात एकूण आठ लाख ७४ हजार ६८८ मतदार आहेत. त्यांपैकी चार लाख ३६ हजार १३५ मतदार हे पुरुष आहेत, तर तब्बल चार लाख ११ हजार ३५७ मतदार महिला आहेत. हा आकडा पाहिल्यास सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक मतदार महिला आहेत. ही बाब लक्षात घेऊन या व्होट बँकेला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्यांची फळी हवी आहे. प्रचारात महिलांची ही फळी उभी करण्यासाठी राजकीय पक्षांनी महिला आघाड्यांची स्थापना करणे, महिला बचतगटांची उभारणी करणे, याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्या महिलांची मोठी फळी उभी करण्याचे काम केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील वाशिम, कारंजाव रिसोड या मतदारसंघात तेच चित्र दिसून येत आहे.