शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात घट

By admin | Updated: July 10, 2014 22:41 IST

अडोळ प्रकल्पात २९ टक्के जलसाठा

रिसोड: रिसोड : शहरवासीयासाठी वरदान ठरत असलेल्या अडोळ धरण प्रकल्पात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्यामुळे शहराला दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून याबाबत नगरपालिका अलर्ट झाल्याचे चित्र आहे.शहराची सध्य़ा लोकसंख्या ३४ हजाराच्या आसपास आहे. शहरासाठी मानसी ७0 लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज शहराकरीता १२.५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा लागतो. मासिक ३0 जून २0१४ च्या अहवालानुसार अडोळ धरणामध्ये केवळ २९ टक्केच जलसाठा उपलब्ध असून ६ ते ७ टक्के जलसाठा मृत साठा आहे. ते पाणी पिण्याच्या योग्य नाही व तसेच १.२५ एम.एम.क्युब आरक्षित साठा आहे. या पाणीसाठय़ाच्या प्रमाणामुळे पाणी कपातचे संकेत शहरवासीयावर येणार आहे.शहरामध्ये ५ साठवण टाक्या असून यामध्ये १६.६५ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. शहरामध्ये ८२ हातपंप असून ६१ पंप कार्यान्वित आहे. शहरामध्ये ३,८७४ नळधारक असून ४ औद्योगिक नळ व ४४ व्यापारीधारक नळ कनेक्शन आहे. सद्यस्थितीला रेकार्डनुसार ३९२२ नळ कनेक्शनधारकाची संख्या आहे. शहरवासीयांना एक दिवसाच्या आड पाणीपुरवठा होत आहे.शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रकल्प अडोळ धरणाचा आहे. तदनंतर पिंगलाक्षी देवी तलावातून पाणी पुरवठा करणे बंद आहे.तसेच अमरदास नगर करीता संत अमरदासबाबा संस्थानच्या विहिरीमधून पाणीपुरवठा होत आहे. अतिशय स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा न.प. प्रशासनामार्फत होत आहे. धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी बचतीबाबत नगर परिषद कठोर भूमिका घेणार आहे.