शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

पारंपारिक पिकांच्या पे-यात घट

By admin | Updated: January 29, 2015 00:35 IST

बदलत्या शेतीपद्धतीमुळे चारा टंचाई; मुग, उडीद, ज्वारी पिकांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ.

वाशिम : गत काही वर्षांपासून विदर्भातील शेतकर्‍यांनी मुग, उडीद, ज्वारी, कपाशी या पिकांकडे पाठ केली असून, कमी खर्चिक आणि कमी परीश्रम लागणारे नकदी पिक म्हणून सोयाबीनकडे मोर्चा वळविला आहे. बदलत्या शेतीपद्धतीमुळे अनेक समस्या उद्भवत असून, चाराटंचाई ही त्यापैकीच एक आहे.जवळपास १५ वर्षांपूर्वीपर्यंत विदर्भात ज्वारी, उडीद, मुग, तूर, कपाशी या पिकांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होता.; परंतु बदलत्या काळानुसार विदर्भातील शेतीपद्धतीमध्येही बदल होत गेला आणि या भागातील पारंपरिक पिके म्हणून ओळखल्या जाणारी उडीद, मुग, कपाशी, ज्वारी या पिकांकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली. त्यापैकी ज्वारी हे पिक, तर जवळपास कालबाहय़च होण्याच्या मार्गावर आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस, बदलते ऋतूचक्र , तसेच शासनाच्या शेतीविषयक कुचकामी धोरणामुळेच शेतकर्‍यांनी या पिकांकडे पाठ फिरविली. अलिकडच्या काळात उडीद, मुग, तूर ही पिके काही प्रमाणात घेतल्या जात असली तरी, त्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक घटले आहे. कपाशीची तीच स्थिती आहे, तर ज्वारीचे पिक मात्र दिसेनासेच झाले आहे. या सर्व पिकांमुळे शेतकर्‍यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध होत अस. उडीद, मुग, तूर या दाळवानांपासून कुटार निघायचे, तर ज्वारीपासून कडबा मिळत असे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे असलेल्या जनावरांच्या चार्‍याची सोय व्हायची.९५ टक्क्यांहून अधिक शेतकरी मळणी यंत्राचा वापर करीत असल्यामुळे या पिकांचे कुटारही बिचार्‍या जनावरांना मिळेनासे झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यात घट झाल्यामुळे सरकी आणि सरकीच्या ढेपेचे उत्पादनही घटले आहे. कधी काळी पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीसाठी विदर्भ प्रसिद्ध होता; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पणन विभागाचे चुकीचे धोरण आणि कपाशीला मिळणार्‍या अत्यल्प दरामुळे शेतकर्‍यांनी कपाशीकडे पाठ फिरविली असून, त्याचा परिणाम येथील उद्योगांवरही झाला आहे.