शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पारंपारिक पिकांच्या पे-यात घट

By admin | Updated: January 29, 2015 00:35 IST

बदलत्या शेतीपद्धतीमुळे चारा टंचाई; मुग, उडीद, ज्वारी पिकांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ.

वाशिम : गत काही वर्षांपासून विदर्भातील शेतकर्‍यांनी मुग, उडीद, ज्वारी, कपाशी या पिकांकडे पाठ केली असून, कमी खर्चिक आणि कमी परीश्रम लागणारे नकदी पिक म्हणून सोयाबीनकडे मोर्चा वळविला आहे. बदलत्या शेतीपद्धतीमुळे अनेक समस्या उद्भवत असून, चाराटंचाई ही त्यापैकीच एक आहे.जवळपास १५ वर्षांपूर्वीपर्यंत विदर्भात ज्वारी, उडीद, मुग, तूर, कपाशी या पिकांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होता.; परंतु बदलत्या काळानुसार विदर्भातील शेतीपद्धतीमध्येही बदल होत गेला आणि या भागातील पारंपरिक पिके म्हणून ओळखल्या जाणारी उडीद, मुग, कपाशी, ज्वारी या पिकांकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली. त्यापैकी ज्वारी हे पिक, तर जवळपास कालबाहय़च होण्याच्या मार्गावर आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस, बदलते ऋतूचक्र , तसेच शासनाच्या शेतीविषयक कुचकामी धोरणामुळेच शेतकर्‍यांनी या पिकांकडे पाठ फिरविली. अलिकडच्या काळात उडीद, मुग, तूर ही पिके काही प्रमाणात घेतल्या जात असली तरी, त्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक घटले आहे. कपाशीची तीच स्थिती आहे, तर ज्वारीचे पिक मात्र दिसेनासेच झाले आहे. या सर्व पिकांमुळे शेतकर्‍यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध होत अस. उडीद, मुग, तूर या दाळवानांपासून कुटार निघायचे, तर ज्वारीपासून कडबा मिळत असे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे असलेल्या जनावरांच्या चार्‍याची सोय व्हायची.९५ टक्क्यांहून अधिक शेतकरी मळणी यंत्राचा वापर करीत असल्यामुळे या पिकांचे कुटारही बिचार्‍या जनावरांना मिळेनासे झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यात घट झाल्यामुळे सरकी आणि सरकीच्या ढेपेचे उत्पादनही घटले आहे. कधी काळी पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीसाठी विदर्भ प्रसिद्ध होता; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पणन विभागाचे चुकीचे धोरण आणि कपाशीला मिळणार्‍या अत्यल्प दरामुळे शेतकर्‍यांनी कपाशीकडे पाठ फिरविली असून, त्याचा परिणाम येथील उद्योगांवरही झाला आहे.